टीम मंगळवेढा टाईम्स।
उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी शुक्रवारी रात्री ९ वाजता १६०० क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. सोलापूर महापालिकेचा मागणीप्रमाणे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात रात्री नऊ वाजता
पॉवर हाऊसमधून १६०० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या टाकळी व चिंचपूर येथील बंधाऱ्यातील पाणीपातळी कमी होऊ लागली होती.
एकूण पाच सहा हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी पोहोचण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो.
यासाठी पाच ते सहा टीएमसी पाण्याचा वापर होणार असून भीमा नदीवरील १७ बंधारे तसेच सोलापूर शहरासह पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व नदीकाठी गावांना व शेतीला याचा फायदा होणार आहे.
सध्या उजनी धरणाची पाणी पातळी केवळ १४.७९ टक्के राहिली आहे. एकूण ७१.५८ टीएमसी पाणीसाठा असून, ७.९२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील दहा ते १२ दिवसांत उजनी धरण मृत साठ्यात जाऊ शकते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज