मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।
रात्रीच्या किर्र अंधारात, साप-विंचवाचा जीवघेणा धोका पत्करत पिकांना पाणी देण्याचा शेतकऱ्यांचा त्रास कधी संपणार? हाच प्रश्न गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी विचारत आहे.
याच गंभीर समस्येवर आता थेट राज्य सरकारने मोठा तोडगा काढला असून शेतकऱ्यांची ही सर्वात मोठी डोकेदुखी आता कायमची मिटणार आहे.

महाराष्ट्र कृषी दिनाचे निमित्त साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक घोषणा केली आहे.

मुंबईत आयोजित कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना आता हक्काची दिवसा वीज मिळणार असल्याचे स्पष्ट केले.

सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात असून, हे वर्ष संपेपर्यंत राज्यातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जाईल. यामुळे यंदाचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवनात नवा प्रकाश घेऊन आला आहे.

या योजनेच्या स्वरूपाविषयी माहिती देताना फडणवीस म्हणाले की, सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज दिली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा पुरवठा वाढवून शेतीसाठी सलग १२ तास वीज उपलब्ध करून दिली जाईल.

त्यामुळेच शेतकऱ्यांचा रात्रीचा ताण संपणार आहे. शेती क्षेत्रातील यांत्रिकीकरणासाठी सध्या संपूर्ण देशात सर्वाधिक बजेट हे महाराष्ट्र सरकारचेच आहे, याकडेही त्यांनी आवर्जून लक्ष वेधले.
दुसरीकडे, बाजारात येणाऱ्या बोगस बियाणांमुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते आणि त्यांची फसवणूक होते.

यावर बोलताना त्यांनी सांगितले की, आता सर्व प्रकारची बियाणे सरकारच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून सर्टिफाइड करणे सक्तीचे करण्यात आले आहे. या नव्या नियमामुळे बनावट बियाणांच्या काळ्या बाजाराला पूर्णपणे आळा बसेल आणि शेतकऱ्यांची फसवणूक थांबेल.
शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर सरकारचा मोठा भर आहे. फडणवीस यांनी सांगितले की, शेतीमधील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी देशातील पहिले कृषी आधारित एआय (AI) ॲप आपल्या कृषी विभागाने विकसित केले आहे. गेल्या तीन वर्षांत राज्याने फलोत्पादन क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.
आगामी काळात पशुपालन क्षेत्राचा विस्तार करून ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जातील. विदर्भ आणि मराठवाड्यातील बदलत्या हवामानानुसार शेती कशी करायची, यावरही सरकार वेगाने धोरण आखत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














