मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात आता पडसाद उमटत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसरीचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या जनतेला आवाहन केलं आहे.
“आखाती युद्धामुळे सध्या जी परिस्थिती ओढवली आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशवासियांना इंधन बचत, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देण्याचे आवाहन केलं आहे. यासाठी देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊ या’ असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या X या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केलं आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल कमी वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसंच सोनं खरेदी करू नका असंही आवाहन केलं आहे. सोनं आपल्याकडे आयात केलं जातं त्यामुळे सोनं खरेदी केल्यामुळे आपल्या देशातील पैसा हा परदेशी चलनात जातो.

तीच परिस्थिती ही इंधनाची आहे, इंधन आपण आयात करतो, त्यामुळे तिथे परकीय चलनात आपला पैसा जातो. त्यामुळे आखाती देशामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. कुणाला राजकारण करायचं असेल तर करू द्या, त्यांनी उत्तर देण्यासाठी आपण समर्थ आहोत. पण, अशावेळी देशासाठी एकसंध उभे राहणे गरजेचं आहे” असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केलं.
पहा व्हिडीओ-
मुख्यमंत्री फडणवीस यांनी काय केलं आवाहन
“छोट्या छोट्या बदलातून देशाला मदत आणि देशसेवा करू शकतो. नवीन वाहन खरेदी करत असताना शक्यतो ईलेक्ट्रिक वाहनं खरेदी करा.

– अनेक शहरांमध्ये आपण ई बसेस दिल्या आहे, मेट्रो सुरू केल्या आहे, त्यामुळे शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.
– जर तुमच्याकडे कारचा वापर करायचा असेल तर समुहाने प्रवास करा, म्हणजे, एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी चार मित्रांनी मिळून प्रवास करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेईकल डे पाळण्याचा प्रयत्न केला.

-कोविड काळामध्ये आपण पारांगत झालो आहोत, त्यामुळे वर्क फ्रॉर्म होम केलं होतं, ते सुद्धा करून पाहा.
– घरात असेल किंवा इतर कुठेही असेल AC हा 24 डिग्रीच्या खाली वापरू नका.
– परदेशातील प्रवेश टाळा, परदेशातील आपल्या मित्रांना सांगून त्यांनाच भारतात फिरण्यासाठी या, असं सांगून पर्यटनाला चालना देऊ शकतात. अशी साधी सोपी कामं आपण करू शकतो.
“राष्ट्र प्रथम या भावनेतून एकजूट होऊ या”
गेल्या १२ वर्षांमध्ये आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ज्या उंचीवर नेलं आहे, ते आपण अनुभवतोय, त्यामुळे यावेळी आपण पंतप्रधानांच्या आवाहनाला साथ द्याल कारण, यातच भारताचं हित आहे. आम्ही आमच्यापासून केली आहे. मी माझा ताफा अर्ध्यावर आणला आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द केले आहे. सरकार पातळीवर इतरही निर्णय घेत आहोत, असं करताना उद्योग जगात आणि संबंधित घटकांचं हित जपलं जाईल. चला आपण सारे मिळून या अभियानामध्ये सहभागी होऊ या, राष्ट्र प्रथम या भावनेतून एकजूट होऊ या.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










