टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथे शेतात शेळया सोडल्याच्या कारणावरून लोखंडी गजाने एकास मारहाण केल्याची घटना घडली असून
या प्रकरणी मोहन तानगावडे, शुभम तानगावडे, राणी तानगावडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी हौसाबाई लहू तानगावडे (वय ५७) यांचे पती सायंकाळी ४.०० वा . शेळया राखण्यासाठी गेले असता फिर्यादीच्या शेजारी राहणारे राणी तानगावडे यांना
शेतात शेळ्या आणू नका असे म्हणाले असता तीने फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ केली व शेळया राखण्याच्या कारणावरून आरोपी मोहन तानगावडे व त्याचा
मुलगा शुभम तानगावडे या दोघांनी फिर्यादीचे पती लहू यांचे हातातील मोबाईल हिसकावून घेवून तो जमिनीवर आपटून फोडला.
तसेच तु माझ्या पत्नीला शेतात शेळया घेवून का येवू नको असे म्हणतोस म्हणून गालावर चापटा मारून तसेच चष्मा फोडला.
तसेच मोहन याचा मुलगा शुभम याने हातातील लोखंडी गजाने फिर्यादीचे पतीच्या उजव्या पायाचे मांडीवर , डोकीवर , पाठीवर मारण्यात आलेल्या दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सदर भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादी पळत आली. व फिर्यादीलाही मारहाण करून जमिनीवर ढकलून दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज