सोलापूर । प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील आसबेवाडी या ग्रामपंचायतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची लेखी तक्रार गटविकास अधिकारी व बांधकाम विभाग यांच्याकडे करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत भावसो आसबे व सौ.राजश्री धनाजी बावचे यांनी ही तक्रार दिली आहे.
दिलेल्या तक्रारी अर्जात म्हंटले आहे की, आसबेवाडी गावातील झालेल्या बोगस कामाची चौकशी व्हावी वार्षिक येणारे अनुदान १५ वित्त काम न करता रक्कमा उचलल्या गेल्या आहेत
जिल्हा परिषद शिक्षण विभाग आलेले अनुदान न कामे करता रक्कमा उचलेले आहे. दोन नवीन शाळा खोल्याचे प्लास्टर न करता बिल काढले आहे.शाळेचे न काम करता बिल काढले आहेत.
१५ वित्त मधील पण बिल काढले खर्च टाकला आहे, शिक्षण विभागाकडून आलेले ८ लाख ते ८ लाख ५० हजार एवढा निधी न काम करता खर्ची टाकला आहे. बिल काढलेले आहे.
तसेच दलित वस्ती साठी १५ टक्के निधी दिला गेला नाही, का व तो निधी कोठे गेला याची कसून चौकशी करावी.
तसेच २०१९ मधील १५ वित्त शिल्लक होता तो निधी कुठे खर्ची टाकला आहे हे पण त्यात खुलासा करावा तसेच गावातील ग्राम निधी २०१९ पासून २ ते २ लाख ५० हजार रुपये जमा झाला आहे.
तो निधी कोठे खर्ची टाकला त्याचा पण खुलासा करावा आम्हा ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामसेवक व सरपंच या दोघांनी मिळून पेशाची लुटमार केली गेली आहे.
तरी ग्रामसेवक व सरपंच यांची चौकशी करून भ्रष्टाचार झाल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज