टीम मंगळवेढा टाइम्स ।
शेत जमिनीच्या वादातून २१ वर्षीय महिलेचा मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवेढा तालुक्यातील चिक्कलगीतील सात जणांवर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, फिर्याद २१ वर्षे पीडित महिलेने दिली आहे.
संशयित आरोपी दत्तात्रय कोळी, साक्षी कोळी, कल्याणी कोळी, संजय कोळी, सुनील कोळी, अनिल कोळी, सुखदेव कोळी (सर्व रा.चिक्कलगी, ता. मंगळवेढा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दुपारच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर घडली आहे.
याबाबत माहिती अशी, शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास फिर्यादी घरासमोर बसले असताना शेतजमिनीच्या रस्त्याच्या कारणावरून तू सारखे केस का करतेस? असे म्हणून दत्तात्रय कोळी याने फिर्यादीचा हात धरून ओढूनमनाला लज्जा वाटेल, असे कृत्य केले.
हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण करून जखमी केले. तसेच साक्षी राजेंद्र कोळी, कल्याणी दत्तात्रय कोळी यांनी पकडून ठेवून हाताने मारहाण केली, सुनील राजेंद्र कोळी हा तेथे आला त्याचे हातातील चाकुसारख्या हत्यार दाखवत दमदाटी केली व त्याने फिर्यादीच्या उजव्या कानातील अर्ध्या तोळ्याची फुले ओढून गेला.
तसेच संजय कोळी, अनिल कोळी, सुखदेव कोळी यांनी शिवीगाळ व दमदाटी करीत जिवे मारण्याची धमकी दिली, म्हणून वरील सात संशयित आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी मारहाण करून विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल योगेश नवले करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज