टीम मंगळवेढा टाईम्स ।
गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर दोन वर्षांनंतर पेटणार असून आज ४१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ होणार आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना मागील वर्षी बंद राहिला होता. मात्र नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्तांतर होऊन अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विजयी झाले.
अभिजित पाटील यांनी चेअरमनपदाची धुरा खांद्यावर येताच दोन महिन्यात कारखाना सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
२०२०-२१ सालच्या गाळप हंगामातील शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले देण्यात आली आहेत. तर तोडणी वाहतूक करारही पूर्ण झाले आहेत. त्यामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
श्रीगुरू बापूसाहेब महाराज देहूकर यांचे हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन होत आहे. प्रा.डॉ.बब्रुवाहन रोंगे व त्यांच्या पत्नी कारखान्याच्या उपाध्यक्ष प्रेमलता रोंगे यांच्या हस्ते होमहवन होणार आहे.
यावेळी सभासद, शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे , असे आवाहन प्र.कार्यकारी संचालक डी.आर. गायकवाड, चेअरमन अभिजित पाटील, संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज