टीम मंगळवेढा टाईम्स ।
दौंड येथून उजनीत येणारा विसर्ग कमी झाल्याने व बंडगार्डन येथील विसर्ग स्थिरावल्याने उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे.
मागील २४ तासात १.७० टक्के वाढ होऊन गुरुवारी धरणाची टक्केवारी ७४ टक्के झाली आहे. तर उपयुक्त जलसाठा ३९ .५८ टीएमसी झाला आहे.
मागील वर्षी याच दिवशी धरणाची टक्केवारी ४०.७४ एवढी होती. उजनीचा जलसाठा संथ गतीने का होईना वाढत आहे.
शेतकऱ्यांतून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी वाढत असल्याने भीमा-सीना जोडकालव्याद्वारे २०० क्युसेक व सीना – माढा उपसा सिंचन योजनेद्वारे १४८ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
धरणातील जलसाठा जसजसा वाढत जाईल तसे दहिगाव उपसा सिंचन व कालव्याद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन धरण व्यवस्थापन प्रशासन करीत आहे.
सिंचनाबरोबरच उजनी धरणावर सोलापूर , पंढरपूर कुर्डुवाडी , बार्शी , सांगोला , मंगळवेढा , अक्कलकोट , मोहोळ , इंदापूर , बारामती , दौंड उस्मानाबाद आदी शहरांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.
याशिवाय चिंचोळी , बारामती , इंदापूर , कुरकुंभ , टेंभुर्णी या औद्योगिक वसाहतींचा पाणीपुरवठा ही उजनीतून केला जातो.
धरणाची सद्यस्थिती
एकूण पाणीपातळी : ४९५.५८५ मीटर .
एकूण जलसाठा : १०३.२४ . टीएमसी .
उपयुक्त जलसाठा : ३९ .५८ टीएमसी .
टक्केवारी : ७३.८८
बंडगार्डन : ५४३८ क्युसेक
दौंड : १००९२ क्युसेक
भीमा सीना बोगदा : २०० क्युसेक
सीना माढा उपसा : १४८ क्युसेक.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज