मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
भारताशी पंगा घेणे पाकिस्तानला चांगलेच महागात पडले आहे. मंगळवारी रात्री उशिरा भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत ९ तळं उद्धवस्त करण्यात आल. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय जवानांनी बदला घेतला.
यावेळी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी मोठी कारवाई केली. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे.
भारताचे हे ऑपरेशन इथेच थांबणार नाही. लष्कर आणि जैशच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर ते सुरूच राहणार आहे, असा स्पष्ट इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ मंगळवारी रात्री १ च्या सुमारास सुरु झाले. त्यानंतर साधारण २५ मिनिटे हे ऑपरेशन सुरु होते. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त झाले. भारताची ही कारवाई केवळ एक ट्रेलर असून, खरा पिक्चर अजून बाकी आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली.
सध्या ऑपरेशन सिंदूरमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. या ऑपरेशनला ३६ तासांहून अधिक काळ लोटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑपेरेशनच्या वेळेपासूनच सक्रिय आहेत. ते स्वतः या लष्करी कारवाईवर लक्ष ठेवून होते.
अजित डोवाल यांच्यासोबतही बैठक
पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानतंर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्यासोबत बैठक केली. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची (CCS) बैठक घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी जागतिक अंतराळ अन्वेषण परिषदेला संबोधित केले.
भारताची अंतराळ यात्रा इतरांशी स्पर्धा करण्यासाठी नाही, तर एकत्रितपणे उंची गाठण्यासाठी आहे. भारत लवकरच एक विशेष जी-२० उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, अशीही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
मोदींची केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी बैठकीदरम्यान पाकिस्तानविरुद्ध चालवलेल्या ऑपरेशनची माहिती आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना दिली.
या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
तसेच संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असेही त्यांना सांगितले. भारतीय लष्कराने तयारीनुसार कोणतीही चूक न करता ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराची खूप प्रशंसा केली.
यानंतर बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी राष्ट्रपतींना ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल माहिती दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर सध्या मोदी हे पूर्णपणे सक्रिय झाले आहेत. ते सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडत भारतात परतले. त्यानंतर २३ एप्रिल रोजी सीसीएसची बैठक घेऊन पाकिस्तानवर कठोर निर्णय घेतले.
लष्कराला पूर्ण सूट
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधू जल करार रद्द केला होता. यासोबत, राजकीय संबंधांमध्ये कपात केली आणि पाकिस्तानसोबतचा व्यापारही बंद केला. पंतप्रधान मोदी एकीकडे ही कारवाई करत असताना दुसरीकडे बैठकांवर बैठका पार पडत होत्या.
या बैठकीत मोदी व्यस्त होते. ते सतत लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत बोलत होते. यावेळी पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. पंतप्रधान मोदींकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले.
भारताची सक्षमता आली दिसून
भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र माऱ्यांना तत्काळ आणि चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामुळे संभाव्य हाणी टळली. यात भारताची संपर्क यंत्रणा आणि वायूदल किती दक्ष आहे याचाच प्रत्यय यानिमित्ताने आपल्या शत्रूराष्ट्राला आला आहे. या प्रतिसादाचे वर्णन क्लिनिकल आणि नियंत्रित असे करण्यात आले आहे, पश्चिम सीमेवरील उच्च तयारी दर्शवते.
कोणतीही जीवीतहाणी नाही
रिपब्लिक न्यूजने दिलेल्या वृ्त्तानुसार, पाकने क्षेपणास्त्र डागल्यानंतर कोणतीही नागरी जीवितहानी किंवा पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. अधिकारी प्रक्षेपणांच्या उत्पत्ती आणि स्वरूपाचा पुढील तपास करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
गुरुद्वाराजवळ एक तोफगोळा पडला, ज्यामुळे त्याच्या बाह्य रचनेचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. गुरुद्वाराच्या भिंतींवर गोळीबाराच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
संशयास्पद ड्रोन स्फोट
भारत-पाकिस्तान सीमेजवळ, गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खावडा भागात हाय-टेन्शन पॉवर लाईनशी आदळल्यानंतर एक संशयास्पद ड्रोन स्फोट झाला. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु त्यामुळे मोठा सुरक्षा इशारा देण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या लष्करी हालचाली वाढल्या
ऑपरेशन सिंदूरच्या एक दिवसानंतर, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ शहरातील धार्मिक स्थळांना लक्ष्य करून विनाकारण तोफगोळ्यांचा मारा केला. त्यानंतर फायरिंगही केली होती. दरम्यान, आता पाकिस्तानच्या लष्करी हालचाली वाढल्या असून गोळीबारासारख्या घटना आणि ड्रोनची घुसखोरी, सायबर हल्ले आणि सीमेलगत सुरु असलेल्या दहशतवादी हालचालीमुळे गुप्तचर संस्था अतिदक्षता बाळगून आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज