टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे आणि जिल्हा अधिकारी पॉझीटिव्ह रुग्णांना घरी उपचार घेण्याची परवानगी नाकारली आहे.
परंतु मंगळवेढा तालुक्यातील खाजगी रुग्णालयाकडून पेशंटची मोठ्या प्रमाणात पैशाची लूट होत असल्याची घटना वारंवार समोर येत आहेत.
सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने खासगी रुग्णालयातील बिलांच्या बाबतीत वारंवार घोळ असला की कारवाई करण्यात येईल असा इशारा देऊन
लेखापरीक्षणासाठी २० ते २५ लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय महानगर पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी सोमवारी घेतला.
मात्र एकीकडे मंगळवेढा तालुक्यात खाजगी रुग्णालया कडून पेशंटची लूट होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
काही दवाखान्यात पेशंट आय सी यु मध्ये नसताना देखील बिल हे आय सी यु प्रमाणे आकारले आहे. असे प्रकार भविष्यात येऊ नये यासाठी. प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
सोलापूर महानगपालिकेने जसा निर्णय घेतला तशाच प्रकारचे नियोजन मंगळवेढा तालुक्यात करण्यात यावे. 2020/21 मध्ये दरपत्रक ठरवून दिलेल आहे त्या प्रमाणे दर पत्रक प्रत्येक रुग्णालयात लावून त्याच प्रमाणे बिले घेतली जावीत.
परंतु अतिरिक्त बिलांची वसुली होत असेल तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, व सर्वसामान्य जनतेची होणारी लूट थांबवावी.
दिनांक दि.15 जानेवारीला एका खाजगी रुग्णालयात रात्री साडेअकरा वाजता पेशंट ऍडमिट करण्यात आला जेव्हा टेस्टिंग करण्यात आले तेंव्हा तो पेशंट पॉझिटिव्ह आहे असे सांगण्यात आले.
रिपोर्ट मागितला असता रिपोर्टही दिला नाही. शेवटी 18 तारखेला तक्रार केल्यानंतर रिपोर्ट देण्यात आला.
दि.16 व 17 तारखेचा दोन दिवसाच्या बिल 17000 करण्यात आली नातेवाईकांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली बिल दिल्यानंतर पाहिले असता त्यामध्ये दोन दिवस पेशंट ICU मध्ये असल्याचे निदर्शनास आले.
परंतु प्रत्यक्षात तो पेशंट जनरल वॉर्डमध्ये एडमिट करण्यात आला होता ज्यावेळी पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
तक्रार केली असता शेवटी निमे बील कमी करण्यात आले. याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो असता त्या ठिकाणी ही दखल घेण्यात आली नाही तेथील पोलीस निरीक्षक माने साहेब यांनी हा विषय तहसीलदार साहेबांचा असून त्यांच्याकडे तक्रार करा.
आम्ही गुन्हा दाखल करणार नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे गुन्हा नोंदवून चौकशी केली जावी की चौकशी करून गुन्हा नोंदवावा हा प्रश्न पडतो. शेवटी सर्वसामान्यांची लूट थांबवावी अन्यथा प्रहार खपवून घेणार नसल्याचा इशारा राजकुमार स्वामी यांनी दिला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज