टीम मंगळवेढा टाईम्स ।
कृषिभूषण डॉ तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण ता.चिपळूण, जि.रत्नागिरी या संस्थेचा वतीने दर वर्षी वर्धापणदिनाचे औचित्य साधून
कृषि, सहकार, शिक्षण, कला, क्रिडा व साहित्य या क्षेत्रामध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन या संस्थेचा २९ मार्च रोजी आयोजित २९ वा वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई तथा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे हे होते.
याप्रसंगी मंगळवेढा येथील प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी सहकार, शिक्षण व पाणी चळवळीच्या क्षेत्रामध्ये गेल्या ४० वर्षात जे उल्लेखनीय काम केले आहे.
त्याची दखल घेवून संस्थेने प्रा. शिवाजीराव काळुंगे यांना “कृषिभूषण डॉ तानाजीराव चोरगे शिक्षण व सहकाररत्न” हा पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केले.
त्याचप्रमाणे गुंजेगांव ता. मंगळवेढा जि. सोलापूर येथील शेतीनिष्ठ शेतकरी व कृषि, जलसंधारण, पाणी आडवा पाणी जिरवा, आदर्श गाव या शासनाच्या योजना सर्व महाराष्ट्रात गावोगावी व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी अविरत झटणारे अधिकारी,
कार्यकर्ते व शेतकरी यांना यावरील विविध योजनांचे प्रशिक्षण गेले ४० वर्षे देणारे दत्तात्रय पाटील यानाही “कृषिभूषण डॉ तानाजीराव चोरगे कृषिरत्न पुरस्कार” डॉ तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते देवून आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सदरप्रसंगी रोख रक्कम पंचवीस हजार, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
सन १९९३ साली डॉ.तानाजीराव चोरगे यांच्या संकल्पनेतून कृषि क्षेत्रामध्ये प्रचार व प्रसार करण्याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता या संस्थेची स्थापना मा. डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केली आणि आज या संस्थेची जवळ जवळ १० ते १२ महाविद्यालये ग्रामिण भागातील मुलामुलींना शिक्षण देण्याचे काम करत आहे.
डॉ.चोरगे यांनी कथा, कादंबरी, नाटक, बँकिंग आदी विषयावरील चाळीसहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे झेप हे सुमारे आठशे पानांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
ते वाचल्यावर एका सर्वसामान्य माणसाने स्वकर्तृत्वाने अनंत अडचणींवर मात करत घेतलेली सामर्थ्यशाली झेप अनुभवास येते. त्यांच्या लेखणीतून उतरलेले जीवनानुभव विविधांगी आहेत. उत्तम सामाजिक भान असलेल्या डॉ. चोरगे यांचे सहकार क्षेत्रातील काम आदर्शवत आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीत त्यांच्या भक्कम नेतृत्वाचे मोठे योगदान आहे.
यावेळी गो.नि. कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य अंजलीताई चोरगे, डॉ.तानाजी चोरगे, प्रा. शिवाजीराव काळुंगे, दत्तात्रय पाटील आदींनी आपले मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावंत यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.सचिन तांबेकर यांनी केले तर आभार प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मानले.
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज