टीम मंगळवेढा टाईम्स ।
दहा वर्षांपूर्वी झालेल्या लग्नावेळी १० तोळे सोने व एक लाख ७५ हजार देऊन लग्न केले. त्यानंतर पुन्हा प्लॉट व चारचाकी घेण्यास माहेरहून पैसे आणण्यासाठी व तुला मूलबाळ होत नाही म्हणून
त्रास देत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी व नवऱ्याने दुसरा विवाह केल्याप्रकरणी पोलिसात पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत श्रद्धा रवींद्र पिंगळे (वय ३३, रा. दत्तनगर, बार्शी) महिलेंनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी पती रवींद्र श्रीकांत पिंगळे, सासू कुंदा पिंगळे, दीर निरंजन पिंगळे, नणंद ज्योती दीपक ढेरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी महिलेचा विवाह २०१४ साली झाला. त्यावेळी हुंड्याच्या स्वरूपात रक्कम व सोने देऊन लग्न करून दिले होते. तीन महिने व्यवस्थित नांदविले.
काही दिवसांनी पतीने वाहन व प्लॉट खरेदीस माहेरहून पैसे आणण्यास तगादा सुरू केल्याने वाहन खरेदीस ६ लाख दिले होते.
फिर्यादीचा पती बँकेत नोकरीस असून ते कामास गेल्यानंतर घरातील आम्ही सांगेल तसेच वागायचे नाही तर आम्ही नांदू देणार नाही,
असे म्हणून त्रास देत होते. त्यानंतर काही दिवसांनी तुला मूलबाळ होत नाही, तू निघून जा. तुझ्यावाचून आमचे काही अडत नाही,
आम्ही दुसरे लग्न लावून देऊ, असे म्हणत त्रास देणे सुरू केले व तिला घरातून हाकलून दिले. यानंतर फिर्यादी महिला ऑक्टोबर २०१६ पासून माहेरी होती.
त्यानंतर तिच्याशी कोणतीच फारकत न घेता पतीने दुसरे लग्न केले. यामुळे याबाबत फिर्यादी महिलेने चौघांविरुद्ध तक्रार दिली आहे. पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज