टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोना महामारीमुळे जवळपास गेल्या दीड वर्षापासून शाळांना लागलेली कुलूपे अद्याप उघडण्यात आली नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत फारशी वाढ झाली नाही. अशातच आता ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता कोरोना परिस्थिती पुर्वपदावर आल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातंय.
शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. आता मुख्यमंत्र्यांनी या निर्णयावर मोहर लावली आहे.
राज्यभर खूप वेगानं लसीकरण चालू आहे. तिसरी लाट येण्याआधीच तिला रोखण्यात देशाला यश मिळताना दिसत आहे. यामुळे अनेक तज्ञ लोक दिवाळीनंतर शाळा सुरु करण्यात काही हरकत नाही,
असं चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आता शाळा सुरू होणार असल्यानं लहान मुलांसाठी लसीकरण मोहिम देखील सुरू करणं गरजेचं आहे. तर सरकार महाविद्यालयाविषयी देखील लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज