टीम मंगळवेढा टाईम्स ।
ऋण काढून सण साजरा करणे ही एक ग्रामीण भागातील म्हण आहे . अर्थात ही म्हण स्वतःचे चैन भागवणान्यांसाठी वापरली जाते. मात्र या म्हणीचा अर्थ बदलून टाकणारी कृती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केली आहे.
त्यांनी स्वतःच्या दोन खासगी कारखान्यांवर कर्ज काढले असून त्या कर्जाच्या रक्कमेतून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिले देण्यास सुरुवात केली आहे 7 सप्टेंबरपासून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे .
श्री वठ्ठिल सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित आणि निवडणूक प्रचारात प्रचंड गाजलेल्या शेतकऱ्यांच्या सुमारे ३० कोटींच्या थकीत ऊस बिलांचा प्रश्न अखेर निकाली काढण्यात चेअरमन अभिजीत पाटील यांनी अवघ्या दीड महिन्यात यश मिळविले.
‘डीव्हीपी’ उद्योग समुहातील दोन खासगी साखर कारखान्यांवर कर्ज काढून आणि अन्य मार्गाने ही रक्कम उभी करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरूवात केली असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सन २०२०-२१ सालच्या हंगामात कारखान्याने ३ लाख ३ हजार मे.टन उसाचे गाळप केले होते. यामधील ३ हजार ३३४ शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे सुमारे ३० कोटी रुपये थकविले होते.
यातील ८०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची ‘एफआरपी’ची संपूर्ण प्रतिटन २१०७ रुपये इतकी रक्कम, तर उर्वरित शेतकऱ्यांचे प्रतिटन १०७ ते १ हजार रुपये या प्रमाणात ऊस बील थकीत होते.
निवडणूकी दरम्यान अभिजीत पाटील यांनी आगामी गाळप हंगाम सुरु करण्यापूर्वी मागील थकबाकीची रक्कम देण्याचा शब्द दिला होता. दि.२१ जुलै रोजी पाटील यांनी चेअरमन पदाची धुरा हाती घेतली.
त्यानंतर केवळ दीड महन्यिात थकीत ऊस बिलांचा प्रश्न मार्गी लावत दिलेल्या शब्दाची पूर्तता केली. तसेच कारखानाही सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे.
‘ती’ साखर खराब
कारखान्याच्या गोदामात असलेली राज्य बँकेच्या ताब्यातील साखर विकून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा विषय सतत पुढे येत होता. उच्च न्यायालयापर्यंत हा विषय पोहोचला होता. यावरही नंतर तोडगा निघाला.
मात्र, ती साखरच अतिशय खराब झालेली असल्याने विकली जात नाही. त्यामुळे ‘धाराशिव’ आणि ‘नांदेड’ येथील साखर कारखाना युनिटवर २२ कोटी ५० लाखाचे कर्ज घेतले.
अन्य मार्गाने उर्वरित रक्कम उभा करून येथील शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले देण्याचा नर्णिय घेतल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले.
दोन्ही मिल चालवणार
यंदाच्या हंगामासाठी कारखान्याची नवीन आणि जुनी मील सुद्धा चालवली जाणार आहे. त्यासाठी तन्हिी बॉयलर, टर्बाईनची कामे पूर्ण केली असून दररोज किमान १० हजार मे.टन ऊस होणार आहे. त्यादृष्टीने ऊस तोडणी-वाहतुकीसाठी ४५० ट्रॅक्टर, ३५० मिनी ट्रॅक्टर, २२५ बैलगाड्यांचे करार पूर्ण केले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज