मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरणाची पाणीपातळी रात्री नऊ वाजता ७५ टक्के झाली आहे, तर दौंड येथून ७४ हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. दर तासाला अर्धा टक्के वाढ होत असली तरी भीमा खोऱ्यातील पाऊस काही प्रमाणात कमी झाला आहे.
यामुळे दौंड येथील विसर्गात रविवारपासून घट होण्याची शक्यता आहे. दौंड येथील विसर्ग घटत जाणार असला तरी उजनी धरणाची पाणीपातळी पुढील दोन ते तीन दिवसांत ९० टक्के पेक्षा जास्त होणार आहे.

यामुळे उजनी पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतीचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
जून महिना कोरडा गेल्याने उजनी शंभर टक्के भरते की नाही याची काळजी सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना लागून राहिली होती.

मात्र, पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात जुलैमधील मुसळधार पावसामुळे भीमा खोऱ्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरली आहेत.

सध्या उजनी धरणात एकूण १०३. ४५ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ४० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. उजनी धरण भरण्यासाठी केवळ १४ टीएमसी पाण्याची गरज आहे. पुढील दोन-तीन दिवसांत दौंड येथील विसर्ग पाहता धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा होणार आहे.

ही धरणे १०० टक्के
भीमा खोऱ्यातील खडकवासला, कळमोडी व आंध्र धरण शंभर टक्के भरले आहेत, तर येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर, चासकमान, भामा असखेड, वडिवळे, पवना, कासारसाई, मुळशी, वारसगाव, पानशेत ही धरणे शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











