टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री वठ्ठिल कारखान्याच्या निवडणुकीतील विजयाने पंढरपूरचे उद्योजक अभिजित पाटील यांचा आत्मवश्विास वाढला असल्याचे दिसून येत आहे. आमदारकीच्या दृष्टीने मंगळवेढा तालुक्यात गावभेटी सुरू केल्या आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील सहकारातील ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे, खरेदी वक्रिी संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे सलग तीनवेळा नेतृत्व केलेले तत्कालीन आ. कै. भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मदतीने आ.समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांचा पराभव करीत ‘भाजपा’चा झेंडा रोवला.
तर इकडे पंढरपूरचे उद्योजक अभिजित पाटील हे भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षसंघटनेच्या नेत्यांशी समान अंतर ठेवताना वठ्ठिल कारखान्यावर लक्ष केंद्रित केले होते.
वठ्ठिल कारखान्याच्या निवडणुकीत डॉ.बी.पी.रोंगे यांच्याशी युती करून सत्ताधाऱ्यांवर आरोपांची राळ उठवत अभिजित पाटील यांनी ‘वठ्ठिल’वर वर्चस्व मिळवले.
मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यात स्वत:चा गट बांधणीचा कार्यक्रम सुरू केला आहे. भालके, परिचारक आवताडे यांच्याशी न जमणाऱ्या मंडळींना एकत्र करू पाहत आहेत.
कै.आ.भारत भालके यांनी जसे प्रस्थापित नेत्यांना दूर सारत दुसऱ्या फळीतील नेत्यांना जवळ केले होते तोच फंडा अभिजीत पाटील राबवत आहेत.
दामाजी कारखान्यातील समविचारी आघाडीच्या विजयाने मंगळवेढा येथील राजकारणाचे संदर्भ बदलले आहेत. निवडणुकी अगोदर बबनराव आवताडे, भालके एकत्र होते.
परंतु, ऐन निवडणुकीत ते वेगळे झाले. आ आवताडे यांच्या विरोधात भालके, परिचारक व इतर एकत्र आल्याने ऐनवेळी आ.आवताडे व बबनराव आवताडे एकत्र आले होते.
त्याचवेळी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते.
आवताडे यांनी पाटील यांचा सत्कार करत राजकारणात कधीही, काहीही होऊ शकते, याची प्रचिती आणून दिली. अभिजित पाटील यांनी यापूर्वी कै.आ.भारत भालके यांच्या गटातील काही जणांशी गट्टी जमवली आहे.
तसेच बबनराव आवताडे यांच्याशीही जवळीक साधली आहे. या सर्व बाबींचा विचार करता, आगामी राजकारणातील बदलाची नांदी तर नाही ना अशी चर्चा रंगतदार ठरत आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज