टीम मंगळवेढा टाईम्स।
उजनी धरणामधून भीमा नदीत आज मंगळवार , दि .१८ मे रोजी स .१० नंतर पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूरचे अधीक्षक अभियंता धिरज साळे यांनी दिली.
सोलापूर महानगरपालिका तसेच इतर पाणी पुरवठा योजना बरोबरच भीमा नदी काठच्या गावांमध्ये सिंचनाच्या तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागलेली होती. नियोजित कार्यक्रमानुसार उजनी धरणामतून भीमा नदीत आज स.१० नंतर पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे.
भीमा नदीत साधारणपणे ५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूर यांच्या कडून देण्यात आली माळशिरस, पंढरपूर तालुक्यातीत भीमा नदीचे पात्र कोरडे पडलेले आहे.
यामुळे भीमा नदीकाठचा शेतकरी अडचणीत आलेला आहे. शेतीच्या व जनावरांना लागणाऱ्या पाण्याबरोबरच भीमा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न भेडसावू लागलेला आहे.
लाभक्षेत्र प्राधिकरण सोलापूर यांच्याकडून योग्य वेळी भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे . उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने खालवणार असून उजनी भीमा धरण उणे १५ ते २० टक्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे . दरम्यान , उजणी धरनामधून उजव्या व डाव्या कालव्यास सुरू असलेले उन्हाळी हंगामाचे आवर्तन सुरूच राहणार आहे , असेही साळे म्हणाले सदया मुख्य कालव्या मधून ३ हजार १५० क्युसेक्स तर बोगद्यामधून ५८० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे .
आज सकाळी १० नंतर सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडले जाणार आहे . यासाठी साधारणपणे ५ टीएमसी पाणी लागणार असून धरण साधारणपणे उणे १५ टक्क्यापर्यंत जाणार आहे . -धिरज साळे , अधीक्षक अभियंता , लाभक्षेत्र प्राधिकरण , सोलापूर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज