टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीवर राज्य शासनाने एकूण २० सदस्यांची नियुक्ती केली आहे.
यामध्ये आमदार बबनराव शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांची विधिमंडळ , संसद सदस्यातून , जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले म्हणून माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे , दीपक साळुंखे – पाटील , उत्तमराव जानकर , निरंजन भूकर
या चार जणांची तर नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित म्हणून १४ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे . यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातील कार्यकत्यांना संधी दिली आहे.
विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये भगीरथ भालके , राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव , सुरेश पालवे – पाटील , विजय खवतोडे , संतोष सुळे , शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील , शिवसेनेच्या अस्मिता गायकवाड , रफिक नदाफ ,
माजी आमदार नारायण पाटील , राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान , काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे , नागेश काकडे , चंद्रकांत देशमुख , बाळासाहेब पाटील यांची निवड केली आहे .
विधानसभा निवडणूक लढविलेले पण पराभूत झालेले सहा उमेदवारांना सदस्याची म्हणून संधी दिल आहे. यामध्ये दीपक साळुंखे पाटील , सिद्धाराम म्हेत्रे, उत्तमराव जानकर , निरंजन भूमकर , नारायण पाटील व भगीरथ भालके यांचा समावेश आहे.
दोन वर्षांनंतर निवडी…
विधानसभा निवडणूक होऊन दोन वर्षे झाल्यानंतर आघाडी सरकारने सर्वसमावेशक सदस्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये सर्वच पक्षातील कार्यकत्यांना संधी दिली आहे.
दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. आमदार, मंत्री झाल्यानंतर पुन्हा नियोजन समितीवर पण त्यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवाय ज्यांच्याकडे संघटनेची जबाबदारी आहे, त्यांना संधी दिली आहे. पक्षाचे संघटनात्मक काम करणाऱ्या कार्यकत्यांनी किती दिवस प्रतिक्षा करायची? असा सवालही काही जणांनी उपस्थित केली आहे. (स्रोत:दिव्य मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज