टीम मंगळवेढा टाईम्स ।
चालू हंगामात उजनीत दौंडमधून 9 हजार 40 क्युसेकचा विसर्ग चालू झाला असून आजपासून त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात संततधार चालू असल्याने भीमा पात्रावरील धरणांतील पाणीठ्यात वाढ दिसून येत आहे.
संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होण्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांत उजनी धरणात 2.5 टक्के पाणीसाठा वाढला असून आतापर्यंत 97 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. त्याचाही परिणाम उजनी पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
सद्यस्थितीला उजनी धरणाची टक्केवारी तब्बल उणे 24 टक्क्यांपर्यंत गेली होती. त्यात वाढ होऊन ती 14.16 टक्के वर आली आहे. त्यामुळे उजनी पाणीसाठ्याचा प्रवास वजामधून अधिककडे होण्यास प्रारंभ झाला आहे.
भीमा नदीच्या खोर्यात असलेल्या सर्व धरणांमध्ये 21 जून रोजी एकूण 19 धरणांपैकी 18 धरणांचा उपयुक्त पाणीसाठा आहे. खोर्यातील सर्वात मोठ्या असलेल्या उजनी धरणात मात्र उणे 14.16 टक्के टक्के इतका पाणीसाठा आहे. उर्वरित 19 धरणांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा आहे.
गेल्या 3 वर्षांत पाऊस लांबत गेल्याने भीमा नदीच्या खोर्यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्यावर्षी परतीच्या पावसाचा मुक्काम लांबला आणि त्यामुळे पाणी वापरही नियंत्रित झाला. यंदाच्या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात झालेला वादळी पाऊस यामुळे शेतीच्या पाण्याची मागणी कमी झाली आहे.
यंदा पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये मिळून 21 जून रोजी तब्बल सहा दलघमी पाणीसाठा आहे.
उजनी वगळता वरील 19 धरणांमध्ये सरासरी 40 ते 50 टक्के इतका पाणीसाठा दिसून येतो. साधारणपणे मोसमी पाऊस सक्रिय होताना धरणांमध्ये एवढा पाणीसाठा नसतो, असे निरीक्षण जलसंपदा विभागाने नोंदवले आहे.
उजनीत दौंड येथून येणार्या विसर्गाला सुरुवात झाल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या उजनीच्या पाणीसाठ्यात येत्या दोन दिवसांपासून हळूहळू वाढ होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरीवर्गाचे उजनी धरण 100 टक्के यावर्षी भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज