टीम मंगळवेढा टाईम्स ।
म्हैसाळ योजनेच्या मूळ आराखड्यामध्ये शिरनांदगी, मारोळी, लवंगी या तलावाचा समावेश नाही. त्यामुळे या तलावाचा समावेश करून या भागाला पाणी कमी पडणार याची काळजी घेऊ आणि जर पाणी कमी पडत असेल तर ते वाढवून कसे घेता येईल याकडे लक्ष देऊन तुम्ही फक्त सुचवत रहावा.
मी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही आमदार समाधान अवताडे यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील म्हैसाळ योजनेतील 19 गावातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी संदर्भातील बैठक सलगर बुद्रुक येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यकारी अभियंता सचिन पवार, उपकार्यकारी स्वप्नील गोसावी, अजिंक्य जाधव, शाखा अभियंता महेश पाटील यांच्यासह भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, जि. प.चे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रा. येताळा भगत, आंबादास कुलकर्णी आदींसह शेतकरी उपस्थित होते.
आतापर्यंत अनेक पिढ्या दुष्काळात गेल्या. आता आमची पिढीही चालली आहे. दुष्काळात जन्मलो. दुष्काळात मरणार नाही, भिष्मप्रतिज्ञा घेऊन मी काम करतोय. अडीच वर्षांच्या कार्यकाळात लोकप्रतिनिधी म्हणून मला जेवढा निधी खेचून आणता येईल त्यापेक्षा अधिकचा निधी खेचून आणला.
मात्र आपल्या भागाचा बॅकलॉग मोठा असल्यामुळे पाणी, रस्ते, वीज यासाठी अधिकचा निधी मिळण्याची प्रयत्न माझे सुरू आहेत, असे समाधान आवताडे म्हणाले.
ज्या योजनेचे पाणी तालुक्याला कधीच प्रस्तावित नव्हते त्या टेंभू योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्याला आणून दाखवण्याचे काम मी केले. उमदी परीसरात पाणी सहजरित्या उपलब्ध होते. मात्र शेवटच्या टोकाला असलेल्या आमच्या भागात पाणी उपलब्ध होण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्याबाबतचे योग्य नियोजन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
शिरनांदगीचे गुलाब थोरबोले यांनी म्हैसाळ योजनेच्या वितरिकेतून तलावात स्वतंत्र लाईनने पाणी सोडण्याची, ओढ्यावरील बंधारे भरून देण्याची मागणी केली. येळगीचे सचिन चव्हाण व सोड्डी शांताप्पा बिराजदार यांनी शेवटच्या टोकावर असलेल्या गावाला पाणी मिळत नाही. पाणी पोहोचवण्याची मागणी केली.
यावर आमदार समाधान आवताडे यांनी लवंगी, पडोळकरवाडी, शिरनांदगी या तलावात मुख्य वितरिकेतून मोठ्या पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पाठवला असून
लवकर त्याला मंजुरी मिळणार असल्याची सांगून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यासाठी संपादित झाल्या त्यामधील तीन गावाचे पैसे प्रांत कार्यालयाकडे आलेले आहेत तर उर्वरित गावाच्या भूसंपादनासाठीचा निधी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिल्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज