समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील पात्र शेतकर्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये यादीत मंगळवेढा तालुक्याच्या ८१ गावांतील ४ हजार ६११ शेतकर्यांना सुमारे ४० कोटी रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे.तर अद्यापही 1 हजार 561 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्यामुळे ते या योजनेस पात्र ठरू शकले नाहीत.
मोठा गाजावाजा करून महाविकास आघाडीने महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून जाहीर केलेल्या यादीत मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 40 कोटींची कर्ज माफी झाली आहे.मंगळवेढा तालुक्यात 4 हजार 611 खातेदारांची माहिती कर्जमाफीसाठी अपलोड करण्यात आली होती.त्यापैकी 3 हजार 763 खाती पात्र झाली असून 323 शेतकरी अपात्र ठरले आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरसकट कर्जमाफी देऊन शेतकर्यांचा सातबारा कोरा करणारच असा शब्द शेतकऱयांना दिला होता.परन्तु भाजपाला धक्का देत काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेने सरकार बनवले परन्तु राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता सरसकट माफी ऐवजी ठाकरे सरकारने पर्यायी मार्ग काढत सरसकट हा शब्द बदलत दोन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी त्यांनी फडवणीस सरकारप्रमाणे कागदपत्राच्या जनजालात न अडकवता सोप्या पद्धतीने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असला तरी या माफीत ठराविक कर्ज घेतल्यामुळे अनेक शेतकरी नाराज आहेत.तालुक्यात यापूर्वी पडलेला दुष्काळ,अपुरा पाऊस,नापिकी,गारपीट यामुळे द्राक्ष पीक डाळिंब ऊस बागायतदार,शेडनेट धारक शेतकरी यांचे खूप मोठे नुकसान झाले असले तरी या माफीचा लाभ त्यांना मिळाला नाही.
तसेच दोन लाखाची अट घातल्यामुळे काही शेतकऱयांचे कर्ज व व्याज मिळून दोन लाखाच्या वरती जाते त्यांना त्याचा लाभ नाही त्यामुळे शेतकरी नाराज आहेत तालुक्यात जाहीर झालेल्या यादीत केवळ 40 कोटींची कर्जमाफी जाहीर झाली आहे.
दरम्यान अजूनही ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही त्यांनी जवळच्या केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केले आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील पात्र शेतकर्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये यादीत मंगळवेढा तालुक्याच्या ८१ गावांतील ४ हजार ६११ शेतकर्यांना सुमारे ४० कोटी रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे.तर अद्यापही 1 हजार 561 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्यामुळे ते या योजनेस पात्र ठरू शकले नाहीत.
मोठा गाजावाजा करून महाविकास आघाडीने महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून जाहीर केलेल्या यादीत मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 40 कोटींची कर्ज माफी झाली आहे.मंगळवेढा तालुक्यात 4 हजार 611 खातेदारांची माहिती कर्जमाफीसाठी अपलोड करण्यात आली होती.त्यापैकी 3 हजार 763 खाती पात्र झाली असून 323 शेतकरी अपात्र ठरले आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरसकट कर्जमाफी देऊन शेतकर्यांचा सातबारा कोरा करणारच असा शब्द शेतकऱयांना दिला होता.परन्तु भाजपाला धक्का देत काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेने सरकार बनवले परन्तु राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता सरसकट माफी ऐवजी ठाकरे सरकारने पर्यायी मार्ग काढत सरसकट हा शब्द बदलत दोन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी त्यांनी फडवणीस सरकारप्रमाणे कागदपत्राच्या जनजालात न अडकवता सोप्या पद्धतीने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असला तरी या माफीत ठराविक कर्ज घेतल्यामुळे अनेक शेतकरी नाराज आहेत.तालुक्यात यापूर्वी पडलेला दुष्काळ,अपुरा पाऊस,नापिकी,गारपीट यामुळे द्राक्ष पीक डाळिंब ऊस बागायतदार,शेडनेट धारक शेतकरी यांचे खूप मोठे नुकसान झाले असले तरी या माफीचा लाभ त्यांना मिळाला नाही.
तसेच दोन लाखाची अट घातल्यामुळे काही शेतकऱयांचे कर्ज व व्याज मिळून दोन लाखाच्या वरती जाते त्यांना त्याचा लाभ नाही त्यामुळे शेतकरी नाराज आहेत तालुक्यात जाहीर झालेल्या यादीत केवळ 40 कोटींची कर्जमाफी जाहीर झाली आहे.
दरम्यान अजूनही ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही त्यांनी जवळच्या केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केले आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज