मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, त्यांना जीवन जगण्याचे पाठबळ मिळावे, यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. मात्र योजनेपासून शेतकरी अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
सर्वात महात्त्वाचे म्हणजे, कुटुंबाला पाठबळ मिळेल या अपेक्षेणे योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची मात्र, घोर निराशा योजनेतून होताना दिसत आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्यांना सहभागी होता येते. योजनेंर्तगत अपघाती मृत्यू झाल्यास, अपघाताने दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये नुकसान भरपाई, एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात पडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, खून, उंचावरुन पडणे, नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावण्याने होणारे अपघाती मृत्यू, दंगलीत होणारे मृत्यू, या कारणांनी मृत्यू झाल्यास या विमा योजनेद्वारे विमा योजनेत सहभागी असणाऱ्यांना लाभ दिला जातो.
त्यासाठी अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, निर्धारित केलेल्या संपूर्ण कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकाऱ्याकडे प्रस्ताव द्यावा लागतो. कंपनीद्वारे शहानिशा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते.
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, त्यांना जीवन जगण्याचे पाठबळ मिळावे, यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. मात्र योजनेपासून शेतकरी अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
सर्वात महात्त्वाचे म्हणजे, कुटुंबाला पाठबळ मिळेल या अपेक्षेणे योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची मात्र, घोर निराशा योजनेतून होताना दिसत आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्यांना सहभागी होता येते. योजनेंर्तगत अपघाती मृत्यू झाल्यास, अपघाताने दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये नुकसान भरपाई, एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात पडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, खून, उंचावरुन पडणे, नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावण्याने होणारे अपघाती मृत्यू, दंगलीत होणारे मृत्यू, या कारणांनी मृत्यू झाल्यास या विमा योजनेद्वारे विमा योजनेत सहभागी असणाऱ्यांना लाभ दिला जातो.
त्यासाठी अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, निर्धारित केलेल्या संपूर्ण कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकाऱ्याकडे प्रस्ताव द्यावा लागतो. कंपनीद्वारे शहानिशा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज