टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र विधीमंडळाचे पावासाळी अधिवेशन आजपासून (22 जून) सुरु होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारची आज पत्रकार परिषद झाली. या अधिवेशनात आमचा प्रयत्न हा संवादाचाच आहे.
विरोधकांनी संवाद ठेवला तर आम्ही चर्चेतून सगळ्या गोष्टींची उत्तर द्यायला तयार आहोत. राजकारण केलं तर राजकीय उत्तर मिळेल, समाजकारण केलं तर सामाजिक उत्तर मिळेल, हितांकरता चर्चा केली तर हितकार्य उत्तर मिळतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तीन आठवडे हे पावसाळी अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात सामान्यांच्या हिताचे निर्णय आम्ही करु असे मुख्यमंत्री म्हणाले. या अधिवेशनात 10 विधेयके आम्ही मांडणार आहोत. यामध्ये महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचं विधेयक असणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार
निवडणुका नसताना आम्ही कर्जमाफी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकलो आहोत. 2029 ची निवडणूक आहे मग 2028-29 मध्ये करु असे म्हणालो नाही. कर्जमाफी आमच्यासाठी राजकीय विषय नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकरी जगला पाहिजे.

शक्ती प्राप्त झाली पाहिजे यासाठी उपक्रम म्हणून पाहातो. कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत झाला नाही. मात्र परिस्थिती अनुरुप कर्जमाफी करावी लागते असे मुख्यमंत्री म्हणाले. कमिटी आपण तयार केली आहे. काही निकष आपण त्यात टाकले आहेत. ही कर्जमाफी 36 हजार 585 कोटी रुपयांची आहे. 56 लाख शेतकऱ्यांना मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात अडचणीची परिस्थिती, एल निनोमुळं पाऊस लांबला
काही गोष्टी निश्चित आपण केल्या आहेत. बॅंकिंग सिस्टिमवर ताण आला आणि त्या अडचणीत आल्यात तर नागपूर वर्धा बुलढाणा सारखी बॅंक अडचणीत आल्याने कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आहे, बँकांसाठी नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही 2 लाख खात्यात भरतो आहोत.

आम्ही याबाबत सभागृहात आकडेवारी देईल. बहुतांश शेतकरी यात असतील. सरकार कर्जमाफी करणारच आहे, काही उपाययोजना सांगितल्या होत्या त्या केल्या आहेत. उपसमिती आपण केली, त्यात मी आणि उपमुख्यमंत्री आहेत असेही फडणवीस म्हणाले.उपसमितीच्या माथ्यमातून अडचणी येतील त्यात बदल आम्ही करु आणि निर्णय घेऊ असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात अडचणीची परिस्थिती तयार झाली आहे. एल निनोनं पाऊस लांबला आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात सरासरीपेक्षा 80 टक्के कमी पाऊस पडला
राज्यात सरासरीपेक्षा 80 टक्के कमी पाऊस पडला आहे. कोकणात 86 टक्क्यांपर्यंत पाऊस कमी आहे. मराठवाड्यात 79 टक्के कमी आहे. काही जिल्ह्यात पावसाचा थेंब देखील नाही. कोकणात 23 जून पासून पावसाचा जोर धरेल असे मुख्यमंत्री म्हणाले. काही प्रमाणात जोराचा पाऊस होईल. विदर्भ, मराठवाडा असेल इथे कमी किंवा मध्यम पाऊस असेल. पेरणी लायक पाऊस सर्वदूर दिसत नाही.
शेतकऱ्यांनी 100 मिमी पाऊस झाल्यावर पेरणी करणं अपेक्षित आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांनी ते पाहून निश्चित करावं. पाणीसाठा 24 टक्के आहे मागील वेळी हा 33 टक्के होता. एकूणच आपण शेतीसाठी आवर्तन होती त्यावर बंदी घातली आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. पिण्याचे पाणी राखून ठेवणं गरजेचं आहे. मान्सून लांबला तर संकट येईल. थोडी शेतकऱ्यांची नाराजी पत्करुन उपसा बंद केला आहे. बियाणांची परिस्थिती चांगली आहे असे ते म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













