टीम मंगळवेढा टाईम्स।
यंदाच्या आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरनगरीत तब्बल ३२ ते ३३ लाख भाविकांचा जनसागर लोटला होता. एवढ्या विक्रमी गर्दीतही साखळी चोरी (चेन स्नॅचिंग) किंवा चोरीची एकही घटना घडली नाही, अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हायटेक बंदोबस्त: सुरक्षेसाठी १० हजार पोलीस, ३०० गामा कमांडो, ३६० सीसीटीव्ही, ड्रोन, ६५ एकर परिसरातील टॉवर रोबो आणि विशेष म्हणजे AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

देशात पहिल्यांदाच ५-जी फोन: तातडीच्या संवादासाठी दुचाकीवरून रस्ता क्लिअर करणाऱ्या पोलिसांना देशात पहिल्यांदाच ५-जी फोन देण्यात आले होते.

२४ तासांत लाखांहून अधिक दर्शन: आषाढीच्या दिवशी २४ तासांत १ लाख ३३ हजार भाविकांनी मुखदर्शन, तर १ लाख १० हजार भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतले.

३० ते ३२ किमी लांब रांगा: भाविकांच्या आणि वाहनांच्या गर्दीमुळे तब्बल ३० ते ३२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

बॉम्बशोधक पथक तैनात: सुरक्षेची कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून गडचिरोलीवरून विशेष बॉम्बशोधक व नाशक पथक पाचारण करण्यात आले होते.

आषाढी वारीत यंदा भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी होती. पोलिसांच्या कठोर मेहनतीमुळे आणि एआय (AI) सारख्या हायटेक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ही वारी पूर्णपणे सुरक्षित आणि यशस्वी झाली.— अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














