टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी प्रकल्पाच्या पाणीवापराच्या फेर नियोजनाबाबत बुधवारी झालेल्या बैठकीत शासनाने मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी अधिकृत आदेश काढत दोन टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे.
या कामासाठी महाविकास आघाडी सरकारचे मतदार संघाच्या वतीने आभार मानत असल्याचे जिल्हा नियोजन सदस्य भगीरथ भालके यांनी सांगितले.
सन २०२१ च्या सुधारित ताळेबंदासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठीचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून प्राप्त झाल्यानंतर प्रकल्प अहवालानुसार २३८८.० ९ दलघमी पाण्याचे नियोजन करण्यात आल्याचा शासन निर्णय झाला आहे.
२०१९ च्या तृतीय सुप्रमा अहवालानुसार मंगळवेढ्याच्या उपसा सिंचन योजनेसाठी २८.५९८ दलघमी इतके पाणी मंजूर करून पाणी व काही गावे कमी केली होती.
त्यावेळी दुष्काळी मंगळवेढा तालुक्यावर अन्याय होत असल्याचे स्व.आ.भारत भालके यांनी महाविकास आघाडी सरकार मध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिलेले होते.
याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात या योजनेतील सर्व गावे व २ टी.एम.सी. पाणी हे पूर्ववत ठेवण्याच्या अटीवर बैठक घेत जलसंपदामंत्री पाटील यांनी यास मान्यता दिली.
यावर बंदिस्त पाईपलाईनद्वारे २१ हजार ३५८ हेक्टरचे सर्वेक्षण करण्यासाठीची निवौदा कृष्णा खोरे महामंडळाने काढली व सर्वेक्षण पूर्ण झालेनंतर पाणी वाटपाबाबत झालेल्या बैठकीत आता मंगळवेढ्याच्या योजनेसाठी ५७.७६३ दलघमी पाणी मंजूर झाले आहे.
२०१४ साली जवळपास ५६० कोटी रुपयाच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील शेतकऱ्यांच्या आशा महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयामुळे आशा पल्लवित झाल्या असून येत्या काही दिवसात या योजनेच्या कामास सुरवात होणार आहे.
स्व.भारत भालके यांचे अपूर्ण असलेले काम मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री दत्तात्रय भरणे
यांच्या माध्यमातून प्रयत्न करून या योजनेच्या पूर्ततेसाठी दुष्काळी गावाला पाणी मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीकडून सातत्याने प्रयत्न चालू असल्याचे भगीरथ भालके यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज