टीम मंगळवेढा टाइम्स ।
कोरोनाच्या अनुषंगाने घालण्यात आलेल्या विविध निर्बंधाचे काटेकोर पालन होत आहे की नाही? यासंदर्भात पोलिसांवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. सोलापूरकरांना ‘कोरोना’तून मुक्ती मिळवून देण्याकामी पोलीस बांधव दिवस-रात्र एक करत आहेत.
हे कमी म्हणून की काय, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पोलिसांवर अतिरिक्त ताण वाढत आहे. त्यामुळे ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी जणू सोलापूरकर पोलीसांची अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.
सोलापूरचे पालकमंत्री आणि जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री अशारितीने दुहेरी फायदा उठवित ना दत्तात्रय भरणे यांनी ‘उजनी’तून ५ टीएमसी पाणी इंदापुरला वळविण्याची मर्दुमुखी गाजविली.
त्यामुळे सोलापूरकरांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘झेंडावंदन’च्या निमित्ताने ते आज शनिवार १ मे २०२१ रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्याच्या निमित्ताने सदरहू पाणीप्रश्न चांगलेच पेटणार असल्याचे दिसून येत आहे.या पार्श्वभुमीवर शहरातील मुख्य रस्तेच नव्हे तर पालकमंत्री ज्या-ज्या ठिकाणी जातील , त्या भागातील रस्ते वाहतूक पोलिसांनी बंदोबस्ताच्या नावाखाली ‘पॅक’ करून ठेवले आहेत.
नेहमी कोरडी असणारी उजनी यंदा पालकमंत्र्यांच्या तथाकथित वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आली. सोलापूरकरांच्या दृष्टीने उजनी धरण हे वरदायिनी आहे. असे असताना सुद्धा या ‘उजनी’वर पुणेकरांनी नेहमीच वक्रदृष्टी ठेवली आहे ‘उजनी’तील पाणी हे सोलापूरकरांचा हक्काचे पाणी असूनसुद्धा पुणेकर त्यावर नेहमीच हक्क दाखवतात हे पालकमंत्र्यांच्या तथाकथित वक्तव्याने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
‘उजनी’तील पाण्याचा एक थेंब सुद्धा मी इंदापूरला नेणार नाही. सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन अशी मुक्ताफळेही पालकमंत्री भरणे यांनी उधळली असली तरी पाणी पुरवठा विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात योजनेतील हक्काचे पाच टीएमसी पाणी हे इंदापूरला नेल्याचे सिद्ध झाले आहे.
इतरवेळी शांत असणारे सोलापूरकर आता चांगलेच खवळले आहेत. विरोधकच काय पण सत्ताधाऱ्यांच्याही निशाणावर सध्या पालकमंत्री असल्याचे दिसून येते. माजी पालकमंत्री आ.विजय देशमुख यांनी तर पालकमंत्री भरणे यांना उजनीचे पाणी इंदापूरला नेत असाल तर सोलापुरात पाय ठेवू देणार नाही , असा इशारा देत खळबळ माजवून दिली.
माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनीसुद्धा एक मे च्या पूर्वसंध्येला पालकमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाने तर आमचा नाद करायचा नाही, असा खणखणीत इशारा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरणे सध्या चर्चेत आहेत.(पुण्यनगरी )
पोळी कशापध्दतीने भाजून घेतात ?
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची मोट बांधली तरच ‘उजनी’च्या पाण्यावर भविष्यात कोणीहीहक्कसांगूशकणार नाही.परंतु आता यात कोणकोण, आपली पोळी कशापद्धतीने भाजून घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज