मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी आणि बारावीची परीक्षा फेब्रुवारी – मार्चमध्ये घेण्यात आली. दहावीचा भूगोलाचा पेपर अद्याप बाकी आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा पेपर पुढे ढकलण्यात आला ; मात्र लॉकडाउनमुळे उत्तरपत्रिका तपासणीत अडथळा निर्माण झाला आहे.
शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी जरी दिल्या जात असल्या तरी पुढील प्रक्रियेत अडचणी असल्याने यंदा दहावी – बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता आहे. उत्तरपत्रिका घरी आणण्यात आणि तपासलेल्या उत्तरपत्रिका परत बोर्डाकडे पाठवण्यास शिक्षकांना अडचणी येत आहेत.
यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्ग काढावा , अशी मागणी शिक्षक , प्राध्यापकांनी केली आहे . लॉकडाउनमुळे दहावीचा शेवटचा पेपर अडकला ; पण त्यापूर्वी झालेल्या इतिहास आणि राज्यशास्त्र पेपरच्या उत्तरपत्रिका पोस्टाची सेवा बंद असल्याने तालुका पातळीवर अडकून पडल्या आहेत . या पेपरची तपासणी अद्याप न झाल्याने निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज