मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । देशभरात आतापर्यंत रुग्णांच्या १ लाख ३० हजार नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून यातील केवळ पाच हजार ३० एवढेच पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . मागील दीड महिन्यांमध्ये केवळ केवळ पाच ते सात टक्के लोकांनाच संसर्ग झाल्याचे आढळून आले असून ही दिलासादायक बाब आहे असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून ( आयसीएमआर ) सांगण्यात आले.
आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. सर्वाधिक जोखीम असलेल्या नऊ राज्यांमध्ये दहा उच्चस्तरीय पथके पाठविण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज