मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । शालेय पोषण आहारांतर्गत मध्यान्ह भोजनासाठी प्राथमिक शाळांसाठी आलेले धान्य मंगळवारपासून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे , अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी दिली.
शालेय पोषण आहार वाटपाबाबत शासनाने परिपत्रक काढले आहे . सर्व प्रकारच्या प्राथमिक शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते . पण कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लाकडाऊन करण्यात आल्यावर सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. प्राथमिक शाळा १५ एप्रिलपर्यंत सुरू राहतील या नियोजनाने शाळांना आहारासाठी धान्य पुरवठा करण्यात आला होता, पण आता शाळा बंद राहणार असल्याने हे धान्य नाशवंत होईल म्हणून शासनाने विद्यार्थ्यांना वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्याप्रमाणे शाळांना मंगळवारपासून हे धान्य प्रति विद्यार्थ्यांना ठरलेल्या परिमाणानुसार वाटप करण्याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सूचित केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज