मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकर्तेदेखील राज्यभरात सेवाकार्य करीत आहेत . सोमवारी पक्षाचा स्थापना दिवस आहे.आतापर्यंत २२ लाख गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यात आली आहे . स्थापनादिवशी २५ लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा टप्पा गाठण्याचा संकल्प करा , असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रविवारी संवादसेतूच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील नगरपालिका व नगर पंचायतींमधील भाजप नगरसेवकांशी संवाद साधला. सद्यस्थितीत भाजपाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी तयार अन्न , अन्नधान्य वाटप करीत आहेत . स्वच्छतेसाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे . मजूर , गरीब , रोजंदारी कामगार इत्यादींची काळजी घेतली जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज