समाधान फुगारे । मंगळवेढा कोरोनाच्या प्रादूर्भावाने झालेल्या लाॅकडाऊनमुळे शहरातील अपंग,निराधार,बेरोजगाराची होणारी गैरसोय लक्षात घेवून पालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला शहरातील दानशूर व्यक्ती व संस्थानी सहकार्यामुळे 600 पेक्षा अधिक कुटुंबाला जीवनाश्यक वस्तूच्या वाटपाचे नियोजन केले.
शहरामध्ये कोरोना रोगाचा संसर्ग वाढू नये म्हणून नगरपालिका ,पोलीस,व महसूल प्रशासनाने उत्तम नियोजन करून शहरात फवारणी व गर्दी करणार्यावर कारवाई केली.जीवनावश्यक साहित्य व भाजीपाला त्यांच्या प्रभागात घराजवळ उपलब्ध करून दिल्यामुळे शहरांमध्ये गर्दीचे प्रमाण कमी राहिले. पुणे मुंबई येथून शहरात आलेल्या नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या व काही आरोग्यविषयक अडचणी निर्माण झाल्यास तातडीने संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यामध्ये उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील,तहसीलदार स्वप्निल रावडे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील,पो.नि.ज्योतिराम गुंजवटे व नगरपालिकेचे नगराध्यक्ष,पक्षनेते,नगरसेवक व इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रभावी नियोजनामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले नाही.
पण गरीब आणि श्रीमंत यांच्यात असलेली दरीला कोरोना रोगाच्या झटक्याने माणसाला माणूसपण दाखवू लागली अशा परिस्थितीत शहरात विविध कामासाठी परराज्यातून आलेल्या अनेक कुटुंबांचा रोजगार गेल्या वीस दिवसांपासून थांबला.
लाॅकडाऊन काळात त्यांना शहरात थांबवल्याने त्या कुटुंबासमोर रोजच्या जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे त्याचबरोबर शहरातील काही अंध, निराधार,अपंग यांच्या संघर्षाला सध्या काळात मदतीचा रूपाने हातभार लावण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने शहरातील दानशूर व्यक्ती व संस्थांना मदतीचे आवाहन करण्यात आले. यामध्ये जवळपास 100 पेक्षा अधिक व्यक्ती व संस्थांनी सहभाग घेत जीवनावश्यक असलेल्या वस्तूंचे साहित्य व रोख रक्कम नगरपालिकेत जमा केली.
त्यामुळे या जमा केलेल्या साहित्यातून प्रत्येक गरजू कुटुंबाला हे जीवनावश्यक साहित्याचे किट भेट देण्यात येणार असून यामध्ये दहा किलो गहू,दोन किलो तांदूळ , ज्वारी , साखर , डाळ,मीठ, हळद, चटणी, शेंगदाणे ,साबण,तेल, व इतर स्वच्छतेचे साहित्य एकत्र करून असे 600 कुटूंबाला हे जीवनावश्यक साहित्याचे किट वंचित कुटूंबाला घरपोच केले जाणार आहे.
यासाठी पक्षनेते अजित जगताप,प्रविण खवतोडे,चंद्रकांत पडवळे,राहूल टाकणे,राहूल सावंजी,दिपक माने,बशीर बागवान,मुझ्झमील काझी,बबलु सुतार सहकार्य केले.
कोरोनासारख्या जागतिक संकटात संतनगरीतील शहरवासीयांनी बेरोजगार ,निराधार ,अपंगांसाठी केलेली मदत कौतुकास्पद आहे.मदतीचा ओघ सुरू असून आणखी गरजू कुटुंबांना नव्याने वाटप करणार आहे. शहरातील गरजूंना मदतीपासून वंचित ठेवणार नाही.- अजित जगताप ,पक्षनेते
नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सर्व्हे करून एकाही कुटुंबाला उपाशी ठेवले जाणार नाही. सर्वांना मदत देता यावी म्हणून दानशूर व्यक्ती आणि नागरिकांनी मदत पालिकेत देऊन या अडचणीच्या काळात सहकार्य करावे.-सौ.पल्लवी पाटील,मुख्याधिकारी
—————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7588214814 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज