पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील श्री.विठ्ठल सह साखर कारखान्याच्या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. यासाठी विठ्ठल परिवारातून मोठी मोर्चेबांधणी सुरू आहे.
यामधीलच एक नेते अभिजित पाटील यांनी गावभेटी दौऱ्याबरोबरच गटनिहाय विचारविनिमय बैठकीच्या माध्यमातून सभा गाजविण्यास सुरुवात केली आहे.
यामध्ये आज रविवार दि २९ मे रोजी सायंकाळी ६ वाजता सरकोली येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या निवडणुकीसाठी नेमके किती पॅनल निवडणूक रिंगणात असतील याबाबत अद्याप अंदाज येत नसला तरी, धाराशिव शुगरचे अभिजित पाटील यांनी मात्र या निवडणुकीत उतरण्यासाठी म कागील अनेक महिन्यापासून तयारी चालू ठेवली आहे.
तालुक्यातील गटनिहाय बैठकीला सभासद वर्ग उपस्थित राहत असल्याचे चित्रही पहावयास मिळत आहे.
तुंगत आणि पट कुरोली येथील विचार विनिमय बैठकीला हजारोंच्या संख्येने उपस्थिती झाली होती. अशाच बैठका उर्वरित गटामधूनही घेण्यासाठी तयारी सुरू आहे.
शेतकऱ्यांचा राजवाडा परत सुरू करण्यासाठी परिवर्तन करूया, शेतकऱ्यांचे हित हीच खरी विठ्ठल सेवा हे ब्रीद वाक्य टाकून अभिजित पाटील दौरे आटोपत आणले आहेत.
विठ्ठल परिवारातील अनेक सभासद यांनी तर आतापासूनच विस्वास ठेवीत अभिजित पाटील यांच्या बैठकांना मोठी उपस्थिती दाखविली जात आहे.
केवळ सभासद नव्हे तर विठ्ठलचे अनेक माजी संचालक यांनी पाठराखण करणेस सुरुवात केली आहे.
या होणाऱ्या विचार विनिमय बैठकीला सभासद, ऊस तोडणी वाहतूकदार कामगार यांना निमत्रित करण्यात येत आहे.
सरकोली हा गट विद्यमान चेअरमन भालके यांचा बालेकिल्ला मानला जातो, याच गटातील ही विचारविनिमय बैठक खुद्द सरकोली गावात होणार आहे.
यामुळे या बालेकिल्ला येथील सभेसाठी किती प्रतिसाद मिळणार हे सभेच्या वेळी उपस्थित सभासद संख्येवरच दिसून येणार आहे.
सध्यागटनिहाय निवडणुकीत पात्र ठरलेल्या सभासद यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. निवडणूक काही दिवसात जाहीर होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन अभिजित पाटील यांच्या गटाकडून फारच मोठी व्यूहरचना आखली जात आहे.
आजवरचा अनुभव पाहता त्यांनी काळे गटातील अनेक मोहरे आपल्या गटात सामावून घेतले आहेत. यामुळे आगामी विठ्ठलची निवडणूक कोण कोणासोबत एकत्रित राहून लढविणार याचा बन्यापैकी अंदाज लागू लागला आहे .
सध्या तरी कारखान्यातील जुनी देणी दिल्याशिवाय विद्यम न संचालक मंडळ निवडणूक लढविण्यासाठी कोणत्याही हालचाली करू शकत नाही.
यामुळे कारखान्याचे संस्थापक चेअरमन कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी आपल्या सोबत कारखान्याचे संस्थापक व्हा चेअरमन स्व .यशवंतभाऊ पाटील यांचे नातू अॅड . गणेश पाटील , आणि अॅड . दीपक पवार यांच्यासह विठ्ठलच्या माजीसंचालकांना सोबत घेऊन ही निवडणूक लढविण्यासाठी तयारी आखली आहे.
त्यांनीही गावभेटी आणि वैयक्तिक भेटी सुरू ठेवल्या आहेतच. मागील निवडणुकीत सर्वच प्रस्थापित नेतेमंडळी एकाच बाजूला असतानाही यांना चांगलीच टक्कर देत आपले नाव सर्व सभासदांच्या घरापर्यंत पोहचविले होते.
ते शिक्षण सम्राट डॉ.बी.पी रोंगे सर यांनीही या निवडणुकीत उतरण्यासाठी तयारी सुरूच ठेवली आहे. अवघ्या काही दिवसातच विठ्ठलची निवडणूक जाहीर होणार आहे.
यामुळे सत्ताधारी संचालक मंडळाच्या विरोधात जे निवडणुकीत आहेत. त्यांनी मात्र निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी ठेवली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज