टीम मंगळवेढा टाईम्स ।
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा शहरावर पाणी टंचाईचे संकट घोंगावत असून, मंगळवेढा नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने शहरातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे कडक आवाहन केले आहे.

शहरात अनेक ठिकाणी नळाला तोट्या (कॉक) नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने निष्काळजी नागरिकांना थेट कारवाईचा इशारा दिला आहे.

…तर नळ कनेक्शन होणार कायमचे बंद
अनेक नागरिक नळाचे पाणी रस्त्यावर मारणे, गटारीत किंवा शौचालयात मोकळे सोडून देणे अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय करत आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, यापुढे जर कोणीही पाणी वाया घालवताना आढळल्यास त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई केली जाईल.

इतकेच नव्हे तर, वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे नळ कनेक्शन कायमस्वरूपी खंडित करण्यात येईल.

प्रशासनाने नागरिकांना केल्या ‘या‘ महत्त्वाच्या सूचना
तोट्या बसवणे बंधनकारक: प्रत्येक नळ कनेक्शन धारकाने आपल्या नळाला तातडीने तोटी/कॉक बसवून घ्यावा.

पाण्याचा अपव्यय टाळा: रस्त्यावर पाणी मारणे, नळ मोकळा सोडून देणे पूर्णपणे थांबवावे.
काटकसरीचा अवलंब: येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये, यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा.

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा
शहराला नजीकच्या काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. या संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि मंगळवेढा नगरपरिषदेला पूर्ण सहकार्य करावे.- पाणी पुरवठा विभाग, मंगळवेढा नगरपरिषद
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













