टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील सलगर बुद्रुक परिसर व इतर दहा ते बारा गावांमध्ये चालू मान्सून हंगामात दोन महिने उलटून गेले तरीही मोठा पाऊस झाला नाही.
चालू पावसाळ्यातील निम्याहून जास्त नक्षत्रे मोठ्या पावसाअभावी कोरडी गेली आहेत.
त्यामुळे श्रावण मासाचे औचित्य साधून गावचे ग्रामदैवत महात्मा नंदी बसवेश्वर व गावातील हनुमान मंदिर, अंबिका मंदीर, मरीआई मंदिर, जोतिबा मंदीर, मातंगीचे मंदिर, गैबीसाहेब दर्गा आदी देवतांना ग्रामस्थांकढुन जलाभिषेक घातला आहे.
जेणेकरून मोठा पाऊस व्हावा, विहीर व विंधन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ व्हावी.
सलगर बुद्रुक सह परिसरातील गावांमधील शेतकरी सुखी व्हावा,अशी भावना घेऊन मोठ्या भक्ती भावाने श्रावण सोमवार निमित्त गावातील सर्वच देवतांना जलाभिषेक करण्यात आला.
देवांना जलाभिषेक केल्यामुळे मोठा पाऊस पडेल व शेतकऱ्यांची चिंता दूर होईल अशी बसवेश्वर भक्तांची धारणा आहे.
सलगर बुद्रुक व परिसरातील गावामधले साठवण तलाव,नाले,ओढ्यावरील साखळी सिमेंट बंधारे आदी जलस्रोत कोरडे ठाक पडले आहेत.
मोठ्या पावसाअभावी या परिसरातील जलस्रोत शोभेच्या बाहुल्या बनून राहिले आहेत. शेतीचक्र कोलमडले आहे. त्यामुळे डाळिंब, द्राक्ष, आंबा चिक्कू व इतर फळपीके घेणारा शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
दोन महिन्या पलीकडे या भागात म्हैसाळ योजनेचे पाणी मूठभर शेतकऱ्यांच्या शिवारात पोहोचले.पण नियोजनाअभावी ते पाणीही सध्या गायब आहे.त्यामुळे म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा किती फायदा या परीसरातील शेतकऱ्यांना होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज