टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी या गावातील व्होडाफोन कंपनीच्या मोबाइल टॉवरमधील ६७ हजार रुपयांच्या २२ बॅटऱ्या चोरट्याने चोरून नेल्या.
दि.१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारील सिद्राम गुरव यांच्या शेतात व्होडाफोन कंपनीचे टॉवर आहे.
यातील फिर्यादी विक्रम तुकाराम यादव (रा.मारापूर) यांच्याकडे त्याच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी आहे. दि.१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यासाठी ते तेथे गेले.
तेव्हा त्यातील २२ बॅटऱ्या नव्हत्या. प्रत्येकी साडेतीन हजारांच्या १२, प्रत्येकी अडीच हजारांच्या १० बॅटऱ्या अशा एकूण ६७ हजारांच्या बॅटऱ्या चोरीस गेल्या आहेत.
याप्रकरणी येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक अमर सुरवसे तपास करीत आहेत.
पुलाच्या कठड्याला मोटारसायकलची धडक , पाठीमागे बसलेला युवक ठार
मोटारसायकलवरून सोलापूरकडे येत असताना भरधाव वेगात पुलाच्या कठड्यास धडक दिल्याने पाठीमागे बसलेला अतुल नागनाथ भोसले (वय २३ , शिंगोली, मोहोळ) हा युवक गंभीर जखमी झाला.
त्यास उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अमर पाटीलसोबत मोटरसायकलवरून मृत अतुल सोलापूरकडे येत होता.
रात्री साडेनऊच्या सुमारास कोंडी पुलावर मोटारसायकल ( एम एच १२ ८० ९ ३ ) कठड्यावर आदळल्याने पाठीमागे असलेला अतुल रस्त्यावर पडला. डोक्यास मार लागल्याने त्यास उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, त्याचा मृत्यू झाला. सोलापूर तालुका पोलिस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद झाली आहे. पुढील तपास फौजदार जाधव करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज