टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतकऱ्यांची अस्मिता असलेला ‘विठ्ठल सहकारी साखर कारखाना’ हडप करायचा या उद्देशाने अख्ख पवार कुटुंबीय आज प्रचार करत फिरत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आ.प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मरवडे, कात्राळ, कर्जाळ, कागस्ट,येड्राव,जित्ती, शिवणगी, आसबेवाडी, सलगर खु,हुलजंती येथील आयोजित सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी आ.गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,मरवडे गावचे सरपंच नितिन घुले,माजी सरपंच रजाक मुजावर,बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळणवर यांच्यासह गावातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.प्रवीण दरेकर पुढे बोलताना म्हणाले की, आजपर्यंत पवार कुटुंबीयांना राज्यातील अनेक साखर कारखाने हडप केलेले आहेत. त्यानंतर त्यांचा डोळा आता विठ्ठल साखर कारखान्यावरती असल्याने त्यांचे सर्व कुटुंबीय आज प्रचारासाठी मंगळवेढा-पंढरपूर या मतदारसंघात येत आहे.
बळीराजाकडे यांनी दुर्लक्ष केले. हातातोंडाशी आलेले पीक पाया गेल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे.,अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान पाहणी करण्यासाठी आम्ही आज गेलो होतो. प्रचारासाठी आलेल्या एकाही मंत्र्याने पाहणी करण्यासाठी जाण्याची तयारी दर्शवली नाही. ठाकरे सरकार मधील मंत्री फक्त निवडणूक अली की मते मागण्यासाठी फक्त येत आहेत.
महावसुली सरकार हे कोरोनाच्या नावावर नागरिकांना कामापासून वंचित ठेवत आहात, लॉकडाउन केल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली नाही. कामगारांच्या खात्यावर 5 हजार रुपये देण्याची मागणी आम्ही केली होती पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. अशा ठाकरे सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचा दावा त्यांनी केला.
मंगळवेढा दुष्काळी तालुका म्हणून या भागाची ओळख आहे,ही ओळख आता पुसायचा वेळ आली आहे. मंगळवेढा विजयानंतर राज्यात भाजपचे सरकार येणार असून समाधान आवताडे यांच्या माध्यमातून भाजप सरकार हे प्रश्न सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आ.गोपीचंद पडळकर बोलताना म्हणाले की,सरकार मधील मंत्री नुसते पोकळ आश्वासन देऊन जातात ते परत कधी येणार आहेत याची कुणाला माहिती नाही. गेल्या पाच वर्षात भाजप सरकारच्या काळात अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत,
मराठा समाजाच्या जीवावर आजपर्यंत यांनी राजकारण केले पण त्यांनी आरक्षण दिले नाही.भाजप सरकारने दिलेले आरक्षण सुद्धा या ठाकरे सरकारने काढून घेतले हा कसला अन्याय मराठा समाजावर झाला आहे.
तरुणांचे भविष्य उज्वल करण्यासाठी भाजप सरकार हा एकमेव पर्याय आहे. समाधान आवताडे आमदार झाल्यानंतर या मतदारसंघाचा पूर्ण चेहरा बदलून जाणार आहे.शेतकरी, सर्वसामान्य लोकांसाठी समाधान आवताडे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
राष्ट्रवादी म्हणजे भूल भुलिया पार्टी असून त्यांनी राज्यातील जनतेची दिशाभूल केली आहे.मंगळवेढा व पंढरपूर तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही जबाबदारी घेतली आहे. शेतकरी देशोधडीला लागला असताना हे सरकार बिल्डर यांना सवलत देण्यात मग्न आहे. शेतकऱ्यांचे वीज पुरवठा खंडित केला त्यांचे बिल माफ केले नाही.
राज्याने अनेक संकटे पाहिजे आहेत.पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घर सोडून बाहेर येत नसतील तर जनतेने कुणाकडे मदत मागायची.
राष्ट्रवादी मध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काहीच किंमत नाही, त्यांना कधी आमदार खासदारकीसाठी उभे केले नाही,आमदारांचा मुलगाच आमदार होणार हीच याच पक्षाचे रीत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.
यावेळी धनगर समाजाचे नेते बापूसाहेब मेटकरी, सतीश शिंदे, राजेंद्र पोतदार, राजाराम कदम,राजाराम कालिबाग,श्रीकांत गणपाटील,पांडुरंग मासाळ, अमोल जाधव,महेश गायकवाड, सोमनाथ टोमके, गणेश पाटील, भारत मासाळ गुरुजी,दत्तात्रय बनसोडे,बजीरंग गायकवाड, आदीजन उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज