मंगळवेढा टाईम्स टीम । राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत माहिती दिली. इयत्ता बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल जुलै अखेरपर्यंत लागेल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. (Education Minister Varsha Gaikwad on HSC SSC Result)
‘लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाला. तर पेपर तपासणीची प्रक्रियादेखील लांबली होती. आमचा प्रयत्न होता लवकरात लवकर निकाल लावण्याचा, मात्र तरीदेखील बारावीचा निकाल जुलै 15 पर्यंत आणि दहावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लागू शकतो, पेपर तपासणीचं काम सध्या सुरु आहे.
ते लवकर झालं तर आणखी लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न आहे’, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
11 वी प्रवेशाबाबत ऑनलाईन प्रक्रिया करून ती सोप्या पद्धतीने करणार आहे. ऑनलाईन शिक्षणाबाबत पालकांच्या अडचणी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
बोर्डाच्या अध्यक्षा काय म्हणाल्या होत्या?
यापूर्वी बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनीही निकालाबाबत माहिती दिली होती. शकुंतला काळे म्हणाल्या, ‘दहावी- बारावीच्या निकालाचं काम अजून चालू आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी अजून सुरु आहे. उत्तरपत्रिका संकलन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका संकलनाची कामंही थांबली होती. हे काम आटोक्यात आल्यानंतर बोर्डच दहावी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करेल. त्यामुळे आत्ता लगेच निकालाची तारीख सांगता येणार नाही.’
दहावी-बारावी निकालाच्या तारखांबाबत अफवा
दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निकालाची चिंता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या निकालाच्या चुकीच्या तारखा व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केलं होतं. (Education Minister Varsha Gaikwad on HSC SSC Result)
मंगळवेढा टाईम्स टीम । राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत माहिती दिली. इयत्ता बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल जुलै अखेरपर्यंत लागेल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. (Education Minister Varsha Gaikwad on HSC SSC Result)
‘लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाला. तर पेपर तपासणीची प्रक्रियादेखील लांबली होती. आमचा प्रयत्न होता लवकरात लवकर निकाल लावण्याचा, मात्र तरीदेखील बारावीचा निकाल जुलै 15 पर्यंत आणि दहावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लागू शकतो, पेपर तपासणीचं काम सध्या सुरु आहे.
ते लवकर झालं तर आणखी लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न आहे’, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
11 वी प्रवेशाबाबत ऑनलाईन प्रक्रिया करून ती सोप्या पद्धतीने करणार आहे. ऑनलाईन शिक्षणाबाबत पालकांच्या अडचणी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
बोर्डाच्या अध्यक्षा काय म्हणाल्या होत्या?
यापूर्वी बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनीही निकालाबाबत माहिती दिली होती. शकुंतला काळे म्हणाल्या, ‘दहावी- बारावीच्या निकालाचं काम अजून चालू आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी अजून सुरु आहे. उत्तरपत्रिका संकलन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका संकलनाची कामंही थांबली होती. हे काम आटोक्यात आल्यानंतर बोर्डच दहावी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करेल. त्यामुळे आत्ता लगेच निकालाची तारीख सांगता येणार नाही.’
दहावी-बारावी निकालाच्या तारखांबाबत अफवा
दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निकालाची चिंता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या निकालाच्या चुकीच्या तारखा व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केलं होतं. (Education Minister Varsha Gaikwad on HSC SSC Result)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज