टीम मंगळवेढा टाइम्स ।
पाच वर्षाच्या कालावधीमध्ये समाधानदादा अवताडे यांना आमदार करण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झालं असे मत श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी यांनी बोलताना व्यक्त केले.
कुलकर्णी पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षात प्रथमता मी दामाजी कारखान्याची निवडणूक हुलजंती गटातून लढवली,मला व आमच्या पार्टीला यश आले, या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने मताधिक्याने समाधानदादा अवताडे यांच्या नेतृत्वाखाली दामाजी कारखान्याची निवडणूक एक हाती सत्ता देऊन सेवा करण्याची संधी दिली होती.
दादांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पाच वर्षात दामाजी कारखाना पारदर्शकपणे वचनपूर्तीतून चालवण्याचा प्रयत्न केला आहे, प्रत्येक हंगाम सुरळीतपणे व्हावा यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याचे कर्मचारी वर्ग त्याच विश्वासाने आपली जबाबदारी पार पाडली, यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र राहिलो,
माझे स्वप्न होते ,समाधानदादा अवताडे यांना आमदार म्हणून पाहण्याचे.दादांनी आम्हा सर्व विद्यमान संचालकावर मोठी जबाबदारी टाकून गेली दोन विधानसभा निवडणूक लढवीत असताना आमच्या प्रयत्नाला म्हणावे असे यश मिळाले नव्हते, पण यावेळी जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या खंबीर पाठबळावर,
भाजपच्या स्वच्छ व पारदर्शक कारभारावर जनतेनी विश्वास ठेवून अखेर मंगळवेढ्याचा भूमिपुत्र आमचे नेते उद्योगपती समाधानदादा अवताडे यांना अखेर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले, दादांनी आमदारकीची शपथ घेतली.
आज खऱ्या अर्थाने आमचे नेते समाधानदादा अवताडे यांना आमदार करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे मत श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यापुढील काळात राजकारण,समाजकारणात तालुक्याचे हित डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय नेते,जनतेचे आमदार समाधानदादा अवताडे मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहतील असा विश्वासही त्यांनी बोलताना दाखवला. आज भारत देशात,महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे थैमान माजले आहे.
आरोग्य विभागासमोर अनेक अडचणी आहेत, सर्वसामान्य जनता भयभीत आहे, त्यांना आधार देणे,योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, ग्रामीण भागात आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी नागरिकांना सर्व उपचार सुविधा मिळण्यासाठी जनतेचे आमदार सदैव तत्पर आहेत.
नागरिकांनी जागृत राहून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत चेअरमन अंबादास कुलकर्णी यांनी बोलताना सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज