मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
उन्हाळा संपून आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याची तारीखही जवळ आली आहे. पालक आणि विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे. मात्र आता राज्यातील शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात 15 जून आणि विदर्भासाठी 22 जून अशी तारीख जाहीर करण्यात आली होती, मात्र आता या संपूर्ण नियोजनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. शिक्षण संचालकांनी जारी केलेले आधीचे आदेश पत्र आता पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे.

का बदलावा लागला निर्णय?
विदर्भातील प्रचंड उष्णता आणि कडक ऊन लक्षात घेता तेथील शाळा 15 जूनऐवजी सोमवारी 22 जूनपासून सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. तसेच 22 जून ते 30 जून या कालावधीत विदर्भातील शाळा केवळ सकाळच्या सत्रात भरवण्याचे नियोजन करण्यात आले होते.

मात्र, या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळांच्या तारखा थेट पुढे ढकलल्या आहेत. आता उन्हाच्या तीव्रतेमुळे विदर्भातील शाळा थेट 30 जूनपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

न्यायालयाचे शिक्षण संचालकांवर ताशेरे
आज कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान नागपूर खंडपीठाने शिक्षण संचालकांनी काल रात्री घाईघाईने काढलेल्या पत्रावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. 22 जूनला शाळा सुरू करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे, अशी स्पष्ट टिप्पणी न्यायालयाने केली. यापूर्वी नागपूर खंडपीठ आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून शिक्षण संचालकांनी असा निर्णय कसा काय घेतला, असा संतप्त सवालही न्यायालयाने उपस्थित केला.

सकाळच्या सत्रात शाळा भरणार
विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुटी व नियमित शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीने रिट याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुषंगाने कळविण्यात येते की, अर्धाधिक दिवसांतील तापमान हे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोकादायक ठरू नये यासाठी निर्देशानुसार येत आहे.

1 जुलै का नाही? न्यायालयाचा सवाल
सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी बाजू मांडताना सांगितले की, राज्य सरकारला संपूर्ण राज्यातील शाळा सुरू करण्याच्या वेळेत एकवाक्यता आणायची आहे. यावर न्यायालयाने सरकारला धारेवर धरत विचारले की, “जर तुम्हाला संपूर्ण राज्यात एकवाक्यता आणायची आहे, तर ती तारीख 15 जूनच का असावी? ती 1 जुलै का असू शकत नाही?” न्यायालयाच्या या प्रश्नामुळे सरकारच्या ‘एकवाक्यता’ आणण्याच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

तसेच दि. 22 जून 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात भरतील व दि. 1 जुलै 2026 पासून शाळा नियमित वेळेत भरतील. उर्वरित राज्यात मात्र शाळा सोमवार दि. 21 जून, 2026 पासून नियोजित वेळेत सुरू होतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













