टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 162 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे.यामध्ये माळशिरसमध्ये दोन, वांगी-1 (करमाळा) आणि भाळवणी (पंढरपूर) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील रुग्णसंख्या आता 36 हजारांकडे वाटचाल करीत आहे. आज दोन हजार 28 संशयितांमध्ये 113 पुरुष आणि 49 महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
ग्रामीणमध्ये आता एक हजार 632 रुग्ण उरले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
रुग्णांच्या संपर्कातील 11 हजार 995 संशयित होम क्वारंटाईनमध्ये तर तीन हजार 79 संशयित इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. अद्याप 49 संशयितांचे अहवाल प्रलंबित असून दररोज सरासरी दोन हजार संशयितांची कोरोना चाचणी केली जात आहे.
दरम्यान, अक्कलकोट तालुक्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता 14 आहे. तर बार्शीत 89, करमाळा 112, माढा 223, माळशिरस 337, मंगळवेढा व मोहोळ तालुक्यात प्रत्येकी 83, उत्तर सोलापुरात 20, पंढरपूर तालुक्यात 538, सांगोल्यातील 111 आणि दक्षिण सोलापुरातील 22 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
जिल्ह्यातील रूग्णसंख्या आटोक्यात यावी म्हणून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क नसलेल्यांना 500 रुपयांचा दंड करण्याचा निर्णय घेतला.
को- मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे घरोघरी सुरु असल्याचा दावा केला जात आहे. तरीही मृतांची व रुग्णांची संख्या ठरावीक तालुक्यात वाढत असतानाही जिल्हा परिषदेकडून ठोस उपाय केले जात नसल्याचे चित्र आहे.
घरोघरी सर्व्हे करणारे दारातूनच निघून जात असल्याचेही दिसून येते. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 3 लाख 30 हजार 540 संशयितांची कोरोना टेस्ट आत्तापर्यंत करण्यात आली आहे. तर ग्रामीणमध्ये आजपर्यंत आढळले 35 हजार 739 कोरोना पॉझिटिव्ह
मृतांची संख्या आता एक हजार 45 झाली
आतापर्यंत 33 हजार 63 रुग्णांनी केली कोरोनावर मात; 1632 रुग्णांवर सुरु आहेत उपचार सुरू आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज