मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांची तब्बल ४८ हजार कोटी रुपयांची थकीत वीज बिलं पूर्णपणे माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
“शेतकऱ्यांची पाटी पूर्णपणे कोरी झाली पाहिजे आणि त्याच कोऱ्या पाटीवर आपल्याला महाराष्ट्राचा नवा इतिहास लिहिता आला पाहिजे, याच एका ध्येयाने आम्ही हा धाडसी निर्णय घेतला आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याबद्दल शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, कर्जमाफी आणि थकीत बिलांच्या मुद्द्यावर मी नेहमीच राज्याच्या आर्थिक शिस्तीबद्दल स्पष्टपणे बोललो आहे.

मात्र, आमच्या महायुतीतील काही सहकारी मंडळींनी जेव्हा माझ्याशी यावर सविस्तर चर्चा केली, तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “जर आम्हाला केवळ आणि केवळ राजकारणच करायचे असते, तर २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटी आम्ही कर्जमाफीचा विचार केला असता. परंतु, आम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या आड कधीही राजकारण आणणार नाही.

राजकारण आम्ही करूच, ते तर करावंच लागेल; पण बळीराजाच्या जीवावर करणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अनेकांना वाटत होतं त्यांचं दुकान चालू राहील, पण…
विरोधकांवर थेट हल्ला करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, “अनेक विरोधकांना वाटत होतं की शेतकऱ्यांच्या थकीत बिलांच्या आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांचं राजकीय दुकान नेहमीच चालू राहील. पण ते बहुधा विसरले की, हे ‘देवाभाऊंचं’ सरकार आहे! आम्ही जे बोलतो, ते करून दाखवतो,” असा घणाघात त्यांनी केला.

मी देखील शेती केलीय, खोलीत बसून निर्णय घेणारा नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मी देखील शेतकऱ्यांचाच मुलगा आहे. आमच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. आजही आमच्या शेतात धानाची शेती होते. वयाच्या पंचवीशीपर्यंत मी ३ महिने शेतातच असायचो. मी पण लहानपणापासूनच शेतात गेलो आहे,

शेती बघितली आहे. एखाद्या खोलीत बसून निर्णय घेणारा मी नाही. हे सगळं आम्ही बघितलय, काही लोकांना वाटतं की आम्ही शहरातून निवडून येतो तर आम्हाला काही समजत नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













