टीम मंगळवेढा टाईम्स।
ऐन पावसाळ्याच्या दिवसांत सोलापूर जिल्ह्यातून पाऊस पूर्णपणे गायब झाला असून, उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. दीड महिन्यापेक्षा जास्त पावसाळा संपूनही नद्या, नाले आणि पाण्याचे स्रोत कोरडे ठणठणीत आहेत. वाढत्या तापमानामुळे शेतातील उभी पिके आणि फळबागा डोळ्यादेखत करपू लागल्याने जिल्ह्यातील शेतकरी कमालीचा हवालदिल झाला आहे.
दुसरीकडे, घामाच्या धारा काढणाऱ्या उष्णतेमुळे आणि विजेच्या सततच्या लपंडावामुळे अबालवृद्ध नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

तापमान ३७ अंशांवर; हवामानात कमालीचा बदल
काही दिवसांपूर्वी मंगळवेढा तालुक्यातील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. त्यामुळे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते आणि नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता.

परंतु, हा आनंद औटघटकेचाच ठरला. आता पुन्हा तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचला असून, पावसाळ्यात उन्हाळ्याची जाणीव होत आहे.

संकटाच्या खाईत बळीराजा: जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
मान्सूनच्या लहरीपणामुळे सोलापूरचा शेतकरी नेहमीच संकटात सापडतो. कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी (दुष्काळ) या चक्रात शेती व्यवसाय उद्ध्वस्त होत आहे. मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आता पिकांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. जर पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही, तर उरलेली पिकेही हातातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

…तर शासनाचे धोरण बळीराजाला मारक ठरेल
अशा भयंकर संकटाच्या वेळी शासनाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे असते. परंतु, प्रशासनाची नेहमीची दप्तरदिरंगाई आणि वेळकाढूपणा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करतो, अशी भावना कष्टकरी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
सोलापूर जिल्हा तातडीने ‘दुष्काळी जिल्हा’ म्हणून जाहीर करावा., शेतकऱ्यांना पीक विमा आणि थेट नुकसान भरपाई मिळावी., सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा., कृषी मालाला योग्य हमीभाव मिळावा., रासायनिक खते व औषधांच्या किमतींवर भरीव सबसिडी द्यावी.

आता या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शासन सोलापूरच्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार की नेहमीप्रमाणे वेळकाढू धोरण अवलंबणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा
सोलापूर जिल्ह्यात सध्या कसलाही पाऊस पडला नाही त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून दुष्काळी जिल्हा जाहीर करावी- ज्ञानेश्वर भंडगे, शेतकरी, भाळवणी, ता.मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












