mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आत्मपरीक्षण! काँग्रेसच्या पराभवासाठी ‘ही’ गोष्ट कारणीभूत? 2024 च्या निवडणुकीआधी वाजली धोक्याची घंटा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 4, 2023
in राजकारण, राष्ट्रीय
कर्नाटकात भाजप कोमात, काँग्रेस जोमात; काँग्रेसची जोरदार मुसंडी; बहुमताचा आकडा आता फक्त काही जागांवर दूर

टीम मंगळवेढा टाईम्स।

चार राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे.

तर, तेलंगणामध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले. मात्र, काही विजयाची अपेक्षा असताना आणि चांगल्या योजना असतानाही राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी असताना काँग्रेसचा हा पराभव म्हणजे पक्षासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधील जोरदार विजयानंतर काँग्रेस हा ‘इंडिया’ या विरोधी पक्षांच्या आघाडीचा मजबूत आधारस्तंभ बनण्याच्या मार्गावर होती. आता हा पराभव त्यात मोठा अडथळा ठरणार आहे.

त्याचवेळी राहुल गांधींनाही या निकालांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता होती. गेल्या वर्षी आपल्या भारत जोडो यात्रेद्वारे राहुल गांधी यांनी देशात काँग्रेससाठी फक्त सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही

तर स्वत:ला एक गंभीर नेता म्हणून लोकांसमोर आणले. त्याचमुळे मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष असतानाही राहुल गांधी लोकांमध्ये काँग्रेसचा चेहरा बनले होते.

काँग्रेसचा पराभव काँग्रेसने केला?

हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये काँग्रेसच्या या लाजिरवाण्या पराभवासाठी इतर घटकांपेक्षा काँग्रेसलाच जबाबदार धरले जात आहे. या पराभवानंतर कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशच्या विजयानंतर काँग्रेसमध्ये आलेला अतिआत्मविश्वास आणि गर्व हे नडलं असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी राष्ट्रीय नेतृत्व आणि पक्षाच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष केले आणि स्वतःच्या जिद्द आणि इच्छाशक्तीच्या आधारे निवडणुकीचे निर्णय घेतले. त्याच्या परिणामी पक्षाला पराभव स्वीकारावा लागला.

अशोक गेहलोत, कमलनाथ आणि भूपेश बघेल या नेत्यांनी तिकीट वाटप करताना पक्षाच्या सर्वे रिपोर्टला बगल देत आपापल्या पद्धतीने तिकीट वाटप केल्याची चर्चा आहे.

तर, काही ठिकाणी तिकीट वाटपासाठी पैसे घेण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकारने चांगले काम केले. विविध योजनांचा फायदा लोकापर्यंत पोहचला. मात्र, स्थानिक पातळीवर विद्यमान आमदारांविरोधात मोठ्या नाराजीचे वातावरण होते. तर गटबाजीचा फटका काँग्रेसला बसला. तर, मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्याकडे पक्षाची एकहाती सूत्रे होती.

कमलनाथ यांच्याशिवाय कोणताच निर्णय होत नसल्याची तक्रार समोर येत होती. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी कुटुंबीय, निकटवर्तीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला. त्याच्या परिणामी काँग्रेसचा केडर फारसा सक्रिय दिसला नाही.

वादग्रस्त मुद्यांवरील मौनाचा फटका

द्रमुक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातनची डेंग्यू आणि मलेरियाशी तुलना करून वादाला तोंड फोडले होते. ज्यात काँग्रेसचे मौन आणि काही नेत्यांची बेताल वक्तव्ये याचा फायदा भाजपने मोठ्या प्रमाणावर घेतला.

या मुद्याला निवडणुकीच्या आधी तापवण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले आणि काँग्रेसच्या बाजूने झुकलेला मतदार पुन्हा एकदा भाजपच्या बाजूने गेला असल्याचे म्हटले जात आहे.

छत्तीसगडमध्ये ही मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या कार्यपद्धतीवर अनेकांना आक्षेप घेतला होता. पक्षांतर्गत गटबाजीदेखील उफाळून येत होती. सरकारवर असलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप, वरिष्ठ नेत्यांमधील गटबाजी आणि बघेल यांच्या मनमानी कारभाराला जबाबदार धरले जात आहे.

काँग्रेस हिंदी पट्ट्यातील जात जनगणना आणि ओबीसींचा मुद्दा उचलून धरत होती, त्याचा फायदा होईल असे म्हटले जात होते. मात्र, काँग्रेस लोकांसाठी प्रभावीपणे काम करू शकेल, असा विश्वास मतदारांना वाटला नसावा हेदेखील एक कारण असल्याचे म्हटले जात आहे.

राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची वाट बिकट?

आज लागलेल्या निकालांचा परिणाम विरोधकांच्या इंडिया आघाडीवर होणार हे स्पष्ट आहे. विरोधकांची आघाडी तयार करण्यात काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, आजच्या निकालाने त्यांना झटका बसला आहे. इंडिया आघाडीच्या आगामी बैठकीत काँग्रेसची वाटाघाटी करण्याची ताकद कमी होणार असल्याचे म्हटले जाऊ लागले आहे.

इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्ष आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वीच जेडीयू आणि नितीश कुमार यांनी पाच राज्यांच्या निवडणुकीत भारत आघाडीबाबत काँग्रेसवर उदासीनता असल्याचा आरोप केला होता. तर मध्य प्रदेशमध्ये जागा वाटपावरून काँग्रेस आणि सपा नेते अखिलेश यादव आमनेसामने आले आहेत.

आगामी काळात सपा, जेडीयू, टीएमसी, आप यासारखे पक्ष आघाडीत काँग्रेसकडे अधिक जागांची मागणी करत आपल्या राज्यांमध्ये अधिक जागांची मागणी करू शकतात.(स्रोत:abp माझा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: राहुल गांधी

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

सोलापूरच्या राजकीय मैदानात खळबळ! शिवसेना नेते अनिल सावंत विधानपरिषद निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत; महायुतीत थरार वाढला

May 20, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पुन्हा निवडणूक! राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला, १६ जागांसाठी कधी होणार मतदान, निकालाची तारीख आली समोर…

May 18, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधानपरिषदेचा धुराळा! सोलापूर महायुतीकडे, पण भाजपच्या कोट्यातून कोणाची लागणार लॉटरी? ‘या’ नावांची चर्चा; भाजपच्या गोटात हालचालींना वेग

May 17, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

May 3, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला तिकीट? भाजपने ‘या’ नावांची यादी दिल्लीला पाठवली; कुणाकुणाची नावे?

April 24, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

April 24, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
Next Post
सोलापूर ब्रेकिंग! चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा; चौघाविरूध्द गुन्हा दाखल

सोने सोडवतो म्हणून ३ लाखांची फसवणूक, फायनान्समध्ये कामाला असल्याची बतावणी; सोलापूर जिल्ह्यातील घटना

ताज्या बातम्या

नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! नीट पेपरफुटी प्रकरणात आला नवा द्विस्ट, परीक्षेनंतर नोट्स, कागदपत्रे रद्दीत विकली

May 25, 2026
जुलै अखेरपर्यंत राज्यातील शिक्षकांच्या बदल्या

संतापजनक! लेकराच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या…” NEET विद्यार्थ्याच्या वडिलांचा आक्रोश; सिस्टिमवर संताप

May 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

भयंकर! लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला, आईला जिवंत जाळलं; पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक

May 24, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

राजकीय घडामोडींना वेग! मंगळवेढ्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाची आज मोठी बैठक; ३७ सेलच्या निवडींबाबत होणार खलबतं; आजी-माजींसह इच्छुकांना बोलावले

May 24, 2026

मंगळवेढ्यात खळबळ! शासकीय कामात अडथळा; शेत रस्त्याच्या कामावरून मंडळ अधिकारी व तलाठ्याला दमदाटी, गुन्हा दाखल

May 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा