मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मी पत्नी काजलवर जीवापाड निस्वार्थी प्रेम केले; पण ती स्वार्थी निघाली..तिने मला धोका दिला. तिच्याकडून माझा शेवट नसता झाला. रोज रोज होणारे वाद सहन होत नाही, अशा आशयाची चिट्ठी लिहून ठेवत येळपणे येथील अमोल चंद्रकांत शिंदे याने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी चौघांविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे, की अमोल चंद्रकांत शिंदे याने अतिशय सामान्य परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून आपल्या नातेवाइकांच्या मदतीने सुरत या ठिकाणी व्यवसाय सुरू केला होता. दीड वर्षांपूर्वी आढळगाव येथील दादा दत्तू मेटे यांची मुलगी काजल हिच्यासोबत त्याचा विवाह झाला होता.
विवाहानंतर अमोल त्याच्या पत्नीसोबत व्यवसायासाठी सुरत येते राहत होता.लग्नाला काही दिवस झाल्यानंतर किरकोळ कारणांवरून काजल अमोलशी भांडण करत होती. ती आपल्या आई, वडील ,भाऊ व आत्या यांच्या सांगण्यावरून अमोलला मानसिक त्रास करत होती. ज्या-ज्या वेळेस भांडण झाले, त्या-त्या वेळी अमोलला त्याच्या सासू सासर्यांनी धमकावून आपल्या मुलीला ते बरोबर घेऊन गेले होते.
सासरे दादा मेटे, सासू निर्मला दादा मेटे, मेहुणी सोनी सुदाम गायकवाड, आते सासू रुक्मिणी संतोष जाधव हे वेळोवेळी फोन करून व कधी प्रत्यक्षात अमोल यास शिवीगाळ व दमदाटी करत असत. येळपणे गावच्या यात्रेनिमित्त अमोल गावाकडे आला होता. 23 फेब्रुवारी रोजी, ‘तू सुरतला राहिलास तरच मी तुझ्याबरोबर संसार करीन; अन्यथा नाही,’ असे म्हणत काजलने आपले वडील दादा दत्तू मेटे यांस बोलावून घेतले व सासरे आल्यावर त्यांनी सर्वांच्या समोर अमोलला शिवीगाळ केली. अमोल त्यांना त्यावेळी म्हणाला, ‘तुम्ही माझ्या सुखी जीवनाचे वाटोळे केले आहे. तुम्हाला तुमचा मुलगा अमोल दादा मेटे याच्या लग्नात दिलेले 2 लाख 70 हजार रुपये दिले नाहीत.’
त्यावेळेस दादा मेटे यांनी अरेरावी करत शिवीगाळ करत ते काजलला दुचाकीवरून घेऊन गेले. जाताना काजलनही, ‘तू मेला तरी तुझ्या अंत्यविधीला सुद्धा येणार नाही.असे म्हणत वडिलांसोबत गेली.’
पत्नीच्या या भाषेचा अमोलला मानसिक धक्का बसला. त्यानंतर काही काळात अमोलने एक एक चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीमध्ये पत्नी काजल, सासरे, सासू, मेहुणी, आते सासू यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. मी आईवडिलांची सेवा करू शकत नाही, याची मला खंत वाटते, असा मजकूर लिहून घरातील छताला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात पत्नी काजलसह, सासरा दादा दत्तू मेटे (रा. आढळगाव ता. श्रीगोंदे), सासू निर्मल दादा मेटे, मेहुणी सोनी सुदाम गायकवाड (रा. थेरगाव ता कर्जत), आते सासू रुक्मिणी संतोष जाधव (रा. चोराची वाडी, ता. श्रीगोंद)े यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद माने करत आहेत.
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मी पत्नी काजलवर जीवापाड निस्वार्थी प्रेम केले; पण ती स्वार्थी निघाली..तिने मला धोका दिला. तिच्याकडून माझा शेवट नसता झाला. रोज रोज होणारे वाद सहन होत नाही, अशा आशयाची चिट्ठी लिहून ठेवत येळपणे येथील अमोल चंद्रकांत शिंदे याने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी चौघांविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे, की अमोल चंद्रकांत शिंदे याने अतिशय सामान्य परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून आपल्या नातेवाइकांच्या मदतीने सुरत या ठिकाणी व्यवसाय सुरू केला होता. दीड वर्षांपूर्वी आढळगाव येथील दादा दत्तू मेटे यांची मुलगी काजल हिच्यासोबत त्याचा विवाह झाला होता.
विवाहानंतर अमोल त्याच्या पत्नीसोबत व्यवसायासाठी सुरत येते राहत होता.लग्नाला काही दिवस झाल्यानंतर किरकोळ कारणांवरून काजल अमोलशी भांडण करत होती. ती आपल्या आई, वडील ,भाऊ व आत्या यांच्या सांगण्यावरून अमोलला मानसिक त्रास करत होती. ज्या-ज्या वेळेस भांडण झाले, त्या-त्या वेळी अमोलला त्याच्या सासू सासर्यांनी धमकावून आपल्या मुलीला ते बरोबर घेऊन गेले होते.
सासरे दादा मेटे, सासू निर्मला दादा मेटे, मेहुणी सोनी सुदाम गायकवाड, आते सासू रुक्मिणी संतोष जाधव हे वेळोवेळी फोन करून व कधी प्रत्यक्षात अमोल यास शिवीगाळ व दमदाटी करत असत. येळपणे गावच्या यात्रेनिमित्त अमोल गावाकडे आला होता. 23 फेब्रुवारी रोजी, ‘तू सुरतला राहिलास तरच मी तुझ्याबरोबर संसार करीन; अन्यथा नाही,’ असे म्हणत काजलने आपले वडील दादा दत्तू मेटे यांस बोलावून घेतले व सासरे आल्यावर त्यांनी सर्वांच्या समोर अमोलला शिवीगाळ केली. अमोल त्यांना त्यावेळी म्हणाला, ‘तुम्ही माझ्या सुखी जीवनाचे वाटोळे केले आहे. तुम्हाला तुमचा मुलगा अमोल दादा मेटे याच्या लग्नात दिलेले 2 लाख 70 हजार रुपये दिले नाहीत.’
त्यावेळेस दादा मेटे यांनी अरेरावी करत शिवीगाळ करत ते काजलला दुचाकीवरून घेऊन गेले. जाताना काजलनही, ‘तू मेला तरी तुझ्या अंत्यविधीला सुद्धा येणार नाही.असे म्हणत वडिलांसोबत गेली.’
पत्नीच्या या भाषेचा अमोलला मानसिक धक्का बसला. त्यानंतर काही काळात अमोलने एक एक चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीमध्ये पत्नी काजल, सासरे, सासू, मेहुणी, आते सासू यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. मी आईवडिलांची सेवा करू शकत नाही, याची मला खंत वाटते, असा मजकूर लिहून घरातील छताला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात पत्नी काजलसह, सासरा दादा दत्तू मेटे (रा. आढळगाव ता. श्रीगोंदे), सासू निर्मल दादा मेटे, मेहुणी सोनी सुदाम गायकवाड (रा. थेरगाव ता कर्जत), आते सासू रुक्मिणी संतोष जाधव (रा. चोराची वाडी, ता. श्रीगोंद)े यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद माने करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज