मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळग्रस्त भागाच्या शेतीला पाणी मिळावे, म्हणून इथला शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून टाहो फोडत आहे. आमदार भारत भालके यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून या दुष्काळग्रस्त भागासाठी वरदान ठरणाऱ्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळवून घेतली. पण, राज्यात त्याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेचे सरकार निवडून आले.
आ.भालके हे त्यावेळी काँग्रेस पक्षातून निवडून घेऊन आमदार झाले. त्यामुळे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून तत्कालीन फडणवीस सरकारने या योजनेकडे डोळेझाक केली. राष्ट्रवादी पक्षाचा सहभाग असलेले महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार स्थापन झाले आहे.
त्यामुळे आमदार भालके हे पहिल्यांदाच सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मतदारसंघाच्या विशेषत: मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळग्रस्त भागाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी आमदार भालके यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी चर्चा होती. या चर्चा सुरू असताना मंत्रिमंडळ विस्ताराकडे आ.भालके यांच्यापेक्षाही मंगळवेढ्याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे जास्त लक्ष होते.
कारण आमदार भारत भालके यांना मंत्रिपद म्हणजे आपल्या शिवारात पाणी येण्याची हमी असेच जणू या भागातील शेतकऱ्यांना वाटत होते. तशा चर्चाही वारंवार होत होत्या. पण मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्यामुळे या भागातील शेतकरी नाराज झाले. पण मंत्रीपद मिळाले नाही तरीही आपला लोकप्रतिनिधी आपल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी तसेच न्याय मिळवून देण्यासाठी खंबीर आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज