टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):
कृष्णा खोऱ्यातील आपल्या हक्काच्या पाण्यासाठी गेल्या ३३ वर्षांपासून अविरत सुरू असलेला लढा आता आणखी तीव्र होणार आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवार, २६ जून रोजी दुपारी १ वाजता मंगळवेढा येथील जोगेश्वरी मंगल कार्यालय (बायपास रोड) येथे ३४ व्या पाणी संघर्ष परिषदेचे जंगी आयोजन करण्यात आले आहे.
कृष्णा खोरे पाणी संघर्ष चळवळीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली असून, या परिषदेचे निमंत्रक वैभवकाका नागनाथ नायकवडी हे आहेत.

‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’ – चळवळीचा मुख्य हेतू
पद्मभूषण क्रांतिवीर स्व. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी, सांगोल्याचे कार्यसम्राट स्व. आ. भाई डॉ. गणपतराव देशमुख, स्व. आर. आर. पाटील आणि साथी स्व. निळूभाऊ फुले यांच्या प्रेरणेतून हा ऐतिहासिक लढा उभा राहिला.

शेतकऱ्याच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही,” याच ध्यासाने कृष्णा खोऱ्यातील सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील १३ दुष्काळी तालुक्यांची ही चळवळ आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे.
परिषदेस उपस्थित राहणारे प्रमुख वक्ते व नेते:
या सोहळ्याला आ. डॉ. बाबासाहेब देशमुख (सांगोला),आ. रोहित आर. आर. पाटील (तासगाव-कवठेमहांकाळ), माजी आ. विक्रमदादा सावंत (जत), माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख (आटपाडी), गौरव नायकवडी,

ज्येष्ठ विचारवंत: प्रा. डॉ. बाबुराव गुरव, प्रा. आर. एस. चोपडे, प्रा. बाळासाहेब नायकवडी, विशंभर बाबर, आनंदराव पाटील, अॅड. सुभाष पाटील, अॅड. सरफराज बागवान, अॅड. भारत पवार, प्रा. दत्ताजीराव जाधव, प्रा. सी. पी. गायकवाड, व्ही. एन. देशमुख, अॅड. बिरप्पा जाधव आणि तुकाराम बाबा महाराज.

पाणी परिषदेच्या मुख्य मागण्या काय आहेत?
शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि अपूर्ण राहिलेल्या पाणी योजना मार्गी लावण्यासाठी या परिषदेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठवला जाईल:
१. मंगळवेढा उपसा सिंचन योजना त्वरित सुरू करणे., २. भीमा, माण आणि कोरडा नदीला कालव्याचा दर्जा देऊन त्यावरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्ण भरणे.
३. उजनी उजवा कालवा तसेच जत, सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ ६ व्या टप्प्यातील अपूर्ण कामे निधीअभावी रखडली आहेत, त्यासाठी तातडीने निधीची व्यवस्था करणे.४. माण व भीमा नदीवर बॅरेजेस बांधणे.
३३ वर्षांचा यशस्वी आणि संघर्षमय इतिहास
पिढ्यानपिढ्या दुष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ११ जुलै १९९३ रोजी आटपाडी येथे पहिली पाणी परिषद पार पडली होती. या ऐतिहासिक लढ्यामुळेच सरकारला ‘कृष्णा खोरे विकास महामंडळाची’ स्थापना करणे भाग पडले. गेल्या ११ वर्षांपूर्वी आटपाडी आणि सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ तलावात पाणी आले, हा या चळवळीचा मोठा विजय होता.

“अपूर्ण कामांच्या आणि हक्काच्या पाण्याच्या लढ्यासाठी शेतकऱ्यांना अजूनही संघर्ष करावा लागणार आहे. म्हणूनच, सर्व दुष्काळग्रस्त तालुक्यातील बंधू-भगिनींनी २६ जून रोजी हजारोच्या संख्येने मंगळवेढ्यात उपस्थित राहावे,” असे आवाहन प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









