टीम मंगळवेढा टाईम्स ।
कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला मंगळवेढा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, व्यापाऱ्यांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवली आहेत.
रस्त्यावर सध्या शुकशुकाट असून शहरवासीयांनी शेतकऱ्यांच्या बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा व्यक्त केला आहे.
काल या बंदला पाठिंबा देण्याच्या संदर्भात येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी शहरातील व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.
मंगळवेढा बंद वरून राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांत सोशल मीडियातून वाद-विवाद @PawarSpeaks @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @bharanemamaNCP @SpSolapurRural https://t.co/aulmqSLjb0 pic.twitter.com/GJJcWQzx32
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) December 8, 2020
त्या आवाहनाला व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिल्याचे आज दिसून आले. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सोमनाथ आवताडे यांनी देखील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज होणारे भाजीपाला व इतर धान्यांचे लिलाव बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला आहे.
याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांनी देखील या बंदला पाठिंबा दिला आहे. राजकीय पक्षांचा सहभाग असला तरी हा राजकीय बंद नाही.
कुठल्याही राजकीय पक्षाच्या वा संघटनेच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हा बंद नाही. मंगळवेढ्यातील बहुतांश सोशल मीडियामध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या समर्थकांनी सोशल मीडियात या बंदला विरोध व्यक्त केला.
तर त्यांच्या विरोधी गटातील काहीजण मात्र हा बंद योग्यच असल्याचे सांगत आहेत. यावरून सोशल मीडियातून वाद-विवाद पाहावयास मिळाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज