टीम मंगळवेढा टाईम्स । करमाळा तालुक्यात बनावट खत विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कृषी विभागाला यश आले असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी केली. (Karamala solapur Counterfeit fertilizer sales case; Strict action should be taken: Bagal)
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषीमंत्री दादा भुसे यांना ई – मेलद्वारे पत्र पाठविले आहे. या प्रकरणात ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली. त्यांना संबंधित विक्रेत्यांनी नुकसानभरपाई द्यावी तसेच शेतकऱ्यांनी खत घेताना अधिकृत कंपनीचे खत घ्यावे . ते घेताना योग्य ती खबरदारी घ्यावी.
कंपनीचे नाव , पिशवीवरील चित्र , त्या खताची मुदत हे सर्व पडताळून बघूनच घ्यावे . जर खत बनावट वाटले तर शेतकऱ्यांची त्यांची तक्रार तालुका कृषी विभागाकडे करावी , असेही दिग्विजय बागल यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज