टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित हवामान अंदाजानुसार दि.१५ ते १८ मार्च २०२३ दरम्यान,
तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस व तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळ वारा (वेग ४० ते ५० किमी प्रति तास) होण्याची शक्यता मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राकडून वर्तविण्यात आली आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने केळी बागेतील वजनाने मोठ्या असलेल्या घडांची झाडे पडु शकतात.
परिपक्व झालेली टरबूज आणि खरबुजाची फळे तोडून घेवून सावलीत ठेवावी व फळे बाजारपेठेत नेण्याची व्यवस्था करावी.
परिपक्व झालेले कांदा पीक काढून घ्यावे. स्थानिक वातावरणाचा अंदाज घेऊन शेतकरी बांधवांनी शेतातील माल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा.
हंगामी पिके, फळबागा, भाजीपाला पिकामध्ये अंतरमशागतीची कामे निंदण (खुरपणी) इत्यादी, तसेच कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनाची फवारणी व
उभ्या पिकात खते देण्याची कामे पावसाच्या उघडीपनंतर करावीत, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. सूरज मिसाळ यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी
सोलापूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील. तसेच पावसासोबत वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने परिपक्व अवस्थेतील रब्बी पिकांची काढणी व मळणी करावी.
काढणी केलेल्या शेत मालाची मळणी करणे शक्य नसल्यास पीक सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून ताडपत्रीचा साहाय्याने झाकून ठेवावे. पक्कभाजीपाला व फळपिकाची काढणी लवकर करून घ्यावी. – डॉ. तानाजी वळकुंदे, प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज