मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पाळधी येथे आपल्या ग्राहकाकडे असलेल्या विवाह सोहळ्यासाठी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला कंटनेरने धडक दिली. अपघातात पती-पत्नी मागच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
महामार्गावर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर झालेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक जागीच थांबून होती. महेंद्र गोपालदास आहुजा (वय 48), भावना महेंद्र आहुजा (वय 48 दोघे रा. गायत्री नगर) अशी मयत पती पत्नीची नावे आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळाहून पसार झाला तर, हाती लागलेल्या क्लिनरला जागीच नागरीकांनी बदडून काढले. आई-वडीलांचे छत्र हरपल्याने मुलांनी प्रचंड आक्रोश केला होता.
गायत्रीनगरात महेंद्र आहुजा पत्नी भावना, मुलाबाळांसह वास्तव्यास होते. त्यांचे फुले मार्केटमध्ये गोपालदास जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. नेहमीच मालाची खरेदीसाठी येणाऱ्या व परिचयाच्या ग्राहकाकडे शनिवारी विवाह सोहळा होता. पती-पत्नी दोघांनी लग्नाला यावे असा हट्ट ग्राहकाच्या कुटूंबीयांनी केल्याने आज महेंद्र व भावना हे दाम्पत्य सोबत दुचाकीने (एम.एच.19 ए.जे.8248) लग्नासाठी घरून निघाले.
दादावाडी येथील घरीच लग्न असल्याचा समज झाल्याने दोघे दादावाडी येथील घरी पोहचले. मात्र, लग्न पाळधी येथील साईबाबा मंदिरावर असल्याचे समजल्याने दोघेही त्याच दुचाकीने पाळधीच्या दिशेने निघाले होते. दादावाडीतून निघाल्यावर काहीच अंतरावर महामार्गावर पाळधीकडेच जात असलेल्या कंटेरने(एम.एच.04 जी.एफ 0984) आहुजा यांच्या दुचाकीला धडक दिली. यात रस्त्यावर पडून कंटेरनच्या मागच्या चाकात दोघेही सापडले. चेहऱ्याला मार लागल्याने महेंद्र यांचा तर, मागील चाक डोक्यावरुन गेल्याने पत्नी भावना यांचा जागीच मृत्यु झाला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज